शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर – मलठण रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे रा. आसेगाव रस्ता, शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर या युवकाचे त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची अल्टो केटेन गाडी नं. MH- १६ AT -१६६२ ही गाडी चालवत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्त्याच्या खाली जावून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरीकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. परंतू उशिरा मदत मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्यानुसार हा युवक शिरुरकडून मलठणकडे आपल्या गाडीसह जात असताना तो पुन्हा येवले माथा येथून मागे वळून पुन्हा शिरुरकडे जात असताना उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्ता सोडून पंधरा फुट लांब असणाऱ्या कठडा नसणाऱ्या विहीरीत गेली. व मोठी दुर्घटना घडली.
शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी कठडे नसलेल्या धोकादायक विहीरी असून त्यांना कठडा नसल्याने मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी विहीर मालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…
आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…