मुख्य बातम्या

अन पुजाचे कलेक्टर होण्याचे स्वप्न अखेर राहिले अधुरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): “माझी पोरगी लयं हुशार व्हती सायेब, तिला कलेक्टर व्हायचं व्हतं, माझ घरदार तीच पुढं घेऊन जाणारी व्हती ओ, पण तीच आम्हाला सोडून गेली, आता सारं संपलय” असा निशब्द शांततेत हुंदका ऐकला अन भिमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक प्रदिप वळसेंच्या डोळ्यात चटकन अश्रू तराळले. अन उपस्थितांनाही गहिवरुन आले. अंत्यसंस्कारावेळी जांबूत ग्रामस्थांनी सुमारे १ लाखाहून अधिक रकमेची मदत तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केली.

मयत पूजा ही मुळची शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई या गावची. घरची परीस्थिती अंत्यंत हलाखीची. मामाच्या गावात जांबुत येथे शिक्षणासाठी आलेली,जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेते, घरची परिस्थिती एकदम बेताची, आई दुसऱ्यांच्या बांधावर मोजमजुरी करते, तर वडील गावातील दुकानांमध्ये, हमालीचे काम करुन आपल्या कुटुंबाची गुजराण करतात.

या नरवडे दाम्पत्याला एकूण तीन मुली, त्यातील पूजा हि दोन नंबरची मुलगी, डोळ्यांमध्ये जराशे अंधत्व, पण शिक्षणामध्ये मात्र एकदम हुशार. दहावी आणि बारावी इयत्तेत अतिशय चांगल्या गुणाने प्राविण्य मिळवले आणि पदवीला प्रवेश घेत कलेक्टर व्हायचे स्वप्न तिने उराशी बाळगले, आई- वडिलांनाही काही प्रमाणात अंधत्वच, मात्र आपल्या प्रामाणिक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम केले. आता मला कलेक्टर होऊन आई वडिलांचे पांग फेडायचे तिने मनाशी ठाम केले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच दडले याची पुसटशी कल्पनाही तिला आली नाही.

अचानक बिबटयाच्या रुपाने काळाने तिच्यावर घाला घातला व बिबट्याच्या हल्ल्यात तिचे दुर्दैवी निधन झाले, आणि कलेक्टर होण्याचे तिचे स्वप्न मात्र अधुरेच राहून गेले. या साऱ्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर “भीमाशंकरचे” संचालक प्रदिप वळसे पाटील मात्र भावनिक झाले, प्रसंगी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याने उपस्थितांना गहिवरून आले.

यावेळी जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे हस्ते कुटुंबियांना दहा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.तर दहा लक्ष रुपयांची ठेव ठेवण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले. मात्र पोटचा गोळा गेला अन पैशाचं मोल काय ? माझी सोनी मला हवी असा हंबरडा मातेने फोडल्यावर अंगावर मात्र शहारे उभारले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सर्व बिबट्यांना तातडीने जेरबंद करा, तर शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्या, अजून किती जणांच्या मृत्यूची वाट बघणार? महावितरणने याची दखल घ्यावी असा आक्रमक पवित्रा घेत वनविभागापुढे मोठे आवाहन उभे केले असून प्रशासनाच्या कारवाईकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागलेले आहे.

बिबटयांचे वनविभागाच्या जागेत बंदिस्त करुन संगोपन करा. शिरुर तालुक्यात ऊसशेतीमुळे बिबटयांची संख्या मोठया प्रमाणात आहे. दररोज शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला होत आहे. नुसता एखादा बिबटया जेरबंद होऊन ऊपयोग नाही. बिबटयाचा प्रश्न ऐरणीवर आला असून या भागात त्यांचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाहीतर या भागातील नागरीकांना मोठे जनआंदोलन उभारावे लागेल, असे मत डॉ. संतोष ऊचाळे यांनी व्यक्त केले आहे..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

16 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago