शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावर भेळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या सरदवाडी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी सातत्याने मागणी होत असुन 9 ऑक्टोबर रोजी येथे रात्री 8 च्या सुमारास रस्ता ओलांडताना कंटेनरने धडक दिल्याने अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.
पुणे-नगर या राष्ट्रीय महामार्गाला सरदवाडी येथे तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने पुण्यावरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना रस्ता ओलांडून जाणाऱ्या व्यक्ती दिसत नाही. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर तसेच शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी पुरुष महिला यांची सतत ये-जा असते त्यामुळे मुलांना ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून पुणे-नगर हा राष्ट्रीय महामार्ग पार करावा लागतो. शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असल्याने तातडीने या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी दलित स्वयंसेवक संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश सरोदे यांनी केली आहे.
सरदवाडी येथे दि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कंटेनर क्रं एम.एच 12 एच.डी 4278 ची धडक बसल्याने कन्हैयालाल हस्तीमल फिरोदिया (वय 78) रा.गोंगलेगल्ली कोर्टाजवळ, अहमदनगर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवावा अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली असुन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेळके यांच्याशी संपर्क साधला असता पुढील आठ दिवसात पुणे-नगर महामार्गावर अशा धोक्याच्या ठिकाणी सगळीकडे पांढरे पट्टे मारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…