मुख्य बातम्या

भीमा नदीच्या पुराचा फटका; आरणगाव वडगाव बांडे बंधाऱ्यावरुन वाहतूक ठप्प…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) सततच्या पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका आरणगाव-वडगाव बांडे बंधाऱ्याला बसला आहे. या बंधाऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने बाजूच्या फॉरेस्ट हद्दीतील भराव वाहून गेला असून बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

 

यामुळे दूध व्यवसायिक, शाळकरी मुले तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन ये-जा बंद झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.सदर ठिकाणी पाटबंधारे विभाग, वन विभाग व महसूल विभाग यांनी पाहणी करून पंचनामा केला असला तरी प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

 

ग्रामस्थांच्या वतीने संतोष लेंडे पाटील, राजेंद्र मखर, संतोष भालेराव, गणेश मखर, संतोष जाधव, सुभाष ओझरकर, हनुमंत कोकाटे, सुनील जाधव, कृष्णाजी कोकाटे आदींनी प्रशासनाला तातडीने भराव भरुन रस्ता सुरु करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन ;पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम; पुरस्थितीत नदी-नाले पार करत आरोपीला पकडले

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

44 सेकंद ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

21 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

27 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

29 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago