मुख्य बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत जागरुक करणे आणि फसवणुकीपासुन बचाव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेस शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रशांत ढोले तसेच रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नागरिकांना खालील बाबींबाबत जागरुक करण्यात आले

१) ऑनलाईन, OTP, KYC अपडेट, Investment व Dating App Fraud यासारख्या फसवणुकींपासून सावध राहावे.

२) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती, OTP, UPI PIN, Debit/Credit Card तपशील देऊ नयेत.

३) समाज माध्यमांवर प्राप्त संशयास्पद लिंक, QR कोड किंवा Apps डाउनलोड करण्यापूर्वी पडताळणी करावी.

४) सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या हेल्पलाईनवर संपर्क करावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

यावेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरुक राहण्याचे, तसेच आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाला सायबर सुरक्षेबाबत माहिती देऊन “सुरक्षित डिजिटल व्यवहार” करण्याचे आवाहन करण्यात आले.

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

13 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

13 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

13 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

17 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

17 तास ago