मुख्य बातम्या

साबळेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालकीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी आरोपी भागा हरी भाईक आणि विश्वनाथ भागा भाईक (दोघे रा. साबळेवाडी, ता. शिरूर) यांनी संगनमताने शासकीय खर्चातून उभारण्यात आलेले तार कंपाऊंड आणि चर हे तोडून उध्वस्त केले. सदर तोडफोडीमुळे एकूण अंदाजे २४,६००/- रुपये किमतीचे शासकीय नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३३३, ३२४(४)(५), ३(५) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होण्याची तारीख १० जून असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

31 मिनिटे ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

35 मिनिटे ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

40 मिनिटे ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

49 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

2 तास ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

2 तास ago