शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाणात शासकीय मालकीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी आरोपी भागा हरी भाईक आणि विश्वनाथ भागा भाईक (दोघे रा. साबळेवाडी, ता. शिरूर) यांनी संगनमताने शासकीय खर्चातून उभारण्यात आलेले तार कंपाऊंड आणि चर हे तोडून उध्वस्त केले. सदर तोडफोडीमुळे एकूण अंदाजे २४,६००/- रुपये किमतीचे शासकीय नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३३३, ३२४(४)(५), ३(५) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होण्याची तारीख १० जून असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे कार्यरत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…