मुख्य बातम्या

शिक्रापूर-न्हावरे राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे संकट

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरे (NH548D) दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना अक्षरशः धुळीच्या वावटळीतून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अलिकडच्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने रस्त्याच्या मुरूमाच्या दबाईसाठी पाण्याचा वापर होत नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धूळ उडत असून, नागरिकांना सर्दी, खोकला, डोळ्यांची चीड व घशाच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

विशेषता दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असून,अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर धुळीचे लोट उठल्याने समोरून येणारी वाहने दिसेनाशी होतात. त्यामुळे अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. हा रस्ता काँक्रिटचा तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम करीत असलेल्या कंपनीने माळवाडी ते न्हावरे एवढा संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. अद्याप काँक्रिटीकरणाचे काम चालू झाले नसल्याने येथे मोठया प्रमाणावर धुळ उडते आहे.

रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ

रस्त्याच्या धुळीमुळे पिकांना त्रास होत असून, धुळीचे कण पानांवर जमा होऊन प्रकाशसंश्लेषण कमी करतात, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. तसेच, धूळ झाडांच्या छिद्रांमध्ये जमा होऊन वायूंची देवाणघेवाण कमी करते, ज्यामुळे पिकांची वाढ आणखीनच मंदावते याचा परिणाम पिकात रोगराई वाढून उत्पन्न घटते.

संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष

नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवसातून किमान ४-५ वेळा पाणी मारणे गरजेचे असताना प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात पाणी टाकले जाते. ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत निखिल कन्स्ट्रक्शन चे जी.एम अनिल दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की आम्ही पाणी मारत आहोत, मात्र नागरिकांचा त्रास लक्षात घेता पाणी मारण्याचे प्रमाण वाढवण्यात येईल. ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत बाब आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर आणि सुरक्षेवर परिणाम होत असुन, ही गंभीर बाब आहे . संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून ठोस उपाययोजना न केल्यास जनतेचा उद्रेक होणे अटळ असुन तातडीने उपाययोजना न झाल्यास धुळीचा त्रास आंदोलनाच्या वनव्यात बदलण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago