मुख्य बातम्या

दोन वकीलांमार्फत ४० लाख देऊन सुद्धा डिल झाली फेल…

पुन्हा २० लाखाची मागणी करताच तक्रारदारालाच जेलमध्ये जायची आली वेळ

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील कन्स्ट्रक्शनचे काम व्यवस्थीत केले नाही म्हणुन एका व्यक्तीने सरकारी कार्यालयात अर्ज करत खोटया तक्रारी करुन शिरुरमधील दोन नामांकीत वकीलांमार्फत तब्बल ४० लाख रुपये घेतले होते. परंतु त्यानंतरही पुन्हा तक्रारी न थांबवता २० लाखाची खंडणी मागितल्याने संबंधित ठेकेदार मधुकर भाऊसाहेब शिंदे (रा. सावेडी ,अहमदनगर) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये सागर बंडू घोलप विरोधात खंडणी घेण्याच्या उद्देशाने त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जुलै २०२१ मध्ये तर्डोबाचीवाडी (ता. शिरुर) येथील मुक्ताईनगर परीसरातील कन्स्ट्रक्शनचे काम व्यवस्थीत केले नाही. याबाबत सागर बंडु घोलप याने बांधकाम ठेकेदार मधुकर शिंदे यांच्या विरुद्ध सरकारी कार्यालयात अर्ज केला होता. तो अर्ज मागे घेण्यासाठी ठेकेदार शिंदे यांच्याकडुन शिरुरमधील दोन नामांकित वकिलांच्या मध्यस्तीने सागर बंडु घोलप याने परत अर्ज करणार नाही. याकरीता 40 लाख रुपये घेतले.

एवढी मोठी रक्कम घेऊनही सागर घोलप याने सदर बांधकाम व्यावसायिकाला त्रास देणे चालुच ठेवले. जुन 2023 मध्ये सागर घोलप याने पुन्हा बांधकामव्यावसायिक मधुकर शिंदे यांच्या विरुद्ध सरकारी कार्यालयात खोटे अर्ज करुन त्रास देणे सुरू केले. तसेच सदरचा अर्ज मागे घेण्याकरिता आणखी 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी मुक्ताईनगर येथे केली. ती रक्कम दिली नाही. तर त्यांच्याविरुद्ध सरकारी कार्यालयात आणखी अर्ज करुन साईडवर नोटीस लावुन बांधकाम व्यवसायात बदनामी करुन तर्डोबाचीवाडी येथील मुक्ताईनगरची साईड बंद पाडण्याची धमकी दिल्याने सागर बंडू घोलप याच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

10 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

10 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

10 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

12 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

23 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

23 तास ago