मुख्य बातम्या

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही कसलाही पोलिस बंदोबस्त नसताना समन्वय साधत तणाव कमी करुन प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता खुला केला.

शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी या रस्त्याबाबत आदेश दिला होता. अर्जदाराने कोर्टात कॅव्हेट दाखल केले असतानाही तहसीलदारांचा आदेश अबाधित राहिला आणि महसूल यंत्रणेच्या कठोर भूमिकेमुळे व समन्वयकांच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यास यश आले.

यावेळी मंडलाधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राम महसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, कोतवाल सारिका वरे, शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड सुप्रिया साकोरे, ॲड सागर जोरी, ॲड योगेश बारहाते, पत्रकार रवींद्र खुडे तसेच पिंपरखेड व चांडोह येथील पोलीस पाटील यांच्यासह वादी व प्रतिवादी शेतकरी आणि परिसरातील शंभराहून अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला शेतरस्ता खुला करण्यास विरोध झाला, मात्र शासन व महसूल यंत्रणेची ठाम भूमिका आणि चळवळीच्या समन्वयाने अनेक वर्षांपासून बंद असलेले दोन महत्त्वाचे रस्ते खुले झाले. त्यामुळे शेकडो एकर जमिनींच्या शेतीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, प्रतिवादी शेतकऱ्याच्या दाणे भरलेल्या उभ्या मका पिकाचे जेसीबीमुळे होणारे नुकसान होऊ नये म्हणून, शरद पवळे व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः दोन सऱ्या उपटून देत शेतकऱ्याला मदत केली. या संवेदनशील भूमिकेचे सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक केले. हा रस्ता खुला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतातच मासवडीचे जेवण देऊन सर्वांचा सत्कार केला. या सामूहिक आनंदसोहळ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकर्‍यांनी शेतकऱ्यांच्या आनंदाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

7 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

8 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

8 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

8 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

8 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

8 तास ago