रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे थेट विद्युत वाहिनीवर चढून अज्ञात व्यक्तीने मुसळधार पाऊसात बेकायदेशीररीत्या जाहिरातीचे फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने उघडकीस आणला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) रांजणगाव पोलिसांकडे पत्र देत संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे.
पिंपरी दुमाला येथे दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी मुसळधार पाऊस चालु असताना विजेच्या खांबावर जाहिरातीचा फलक लावण्यात आल्याचे वृत्त ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. सदर जाहिरात फलक बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली हि बाब तपासात उघड झाली. प्रत्यक्षात अशा परवानग्या महावितरण कधीच देत नाही.
रांजणगाव महावितरणचे शाखा अभियंता दिपक पंढरीनाथ पाचुंदकर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना याबाबत पत्र दिले आहे. त्यात “हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत जीवघेणा आहे. वीज वाहिनीवर जाहिरात फलक बसवणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण. त्यामुळे संबंधित अज्ञात व्यक्ती किंवा जाहिरात एजन्सीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी.” असे नमुद केले आहे.
तसेच या पत्राची प्रत महावितरणचे केडगाव येथील कार्यकारी अभियंता आणि शिक्रापुर येथील उपकार्यकारी अभियंता यांनाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता रांजणगाव पोलिसांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?
रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…