मुख्य बातम्या

अण्णापूरमध्ये बेकायदेशीर घातक कचरा जाळल्याचा प्रकार

पर्यावरणाची मोठी हानी, नागरिकांच्या जीवाला धोका, प्रशासन मूग गिळून गप्प

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावात (दि. २२) एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व रबरसदृश्य घातक कचरा बेकायदेशीररित्या जाळण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात विषारी धुराचे लोट पसरले असून, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांना सजग नागरिकांकडून याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याचा पाठपुरावा सुरू केला. व्हिडिओ पुराव्यांसह त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांना व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. दुर्दैवाने, एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही . ना फोन उचलला, ना संदेशांना उत्तर दिले. हा प्रशासनाचा निर्लज्ज दुर्लक्षाचा कळस म्हणावा लागेल.

शेवटी वाळुंज यांनी डायल ११२ वर संपर्क करून मदत मागितली. टाकळी हाजी पोलिस चौकीचे भाऊसाहेब ठोसरे यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक घातक कचरा आढळून आला. स्थानिक नागरिकांचा संशय आहे की, या प्रकरणात औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या आणि स्थानिक व्यक्तींचा हात आहे.

सामाजिक कार्यकर्ते वाळुंज म्हणाले, “कायद्यांचा बडगा केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणीचा पूर्ण अभाव दिसून येतो. त्यामुळेच असे गंभीर प्रकार उघडपणे घडतात.”याप्रकरणी लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार सादर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीनेही पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचे ठरवले आहे.

या घातक प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पर्यावरण व आरोग्याचा विचार करता प्रशासनाने तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मुख्यमंत्री व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

6 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

6 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

7 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

7 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

7 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

7 तास ago