मुख्य बातम्या

अण्णापूरमध्ये बेकायदेशीर घातक कचरा जाळल्याचा प्रकार

पर्यावरणाची मोठी हानी, नागरिकांच्या जीवाला धोका, प्रशासन मूग गिळून गप्प

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावात (दि. २२) एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व रबरसदृश्य घातक कचरा बेकायदेशीररित्या जाळण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात विषारी धुराचे लोट पसरले असून, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांना सजग नागरिकांकडून याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ याचा पाठपुरावा सुरू केला. व्हिडिओ पुराव्यांसह त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांना व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. दुर्दैवाने, एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही . ना फोन उचलला, ना संदेशांना उत्तर दिले. हा प्रशासनाचा निर्लज्ज दुर्लक्षाचा कळस म्हणावा लागेल.

शेवटी वाळुंज यांनी डायल ११२ वर संपर्क करून मदत मागितली. टाकळी हाजी पोलिस चौकीचे भाऊसाहेब ठोसरे यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक घातक कचरा आढळून आला. स्थानिक नागरिकांचा संशय आहे की, या प्रकरणात औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या आणि स्थानिक व्यक्तींचा हात आहे.

सामाजिक कार्यकर्ते वाळुंज म्हणाले, “कायद्यांचा बडगा केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणीचा पूर्ण अभाव दिसून येतो. त्यामुळेच असे गंभीर प्रकार उघडपणे घडतात.”याप्रकरणी लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार सादर करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीनेही पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचे ठरवले आहे.

या घातक प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पर्यावरण व आरोग्याचा विचार करता प्रशासनाने तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. मुख्यमंत्री व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

1 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

4 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

22 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago