मुख्य बातम्या

वृक्षतोडीमुळे पंचायत समितीचे सुशोभिकरणाचे उदघाटन वादाच्या भोवऱ्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीचे सुशोभिकरण या कार्यालयातील गटविकास अधिकाऱ्यानी केलेल्या मोठ्या वृक्षतोडीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुशोभिकरणाच्या उद्घाटनाचा सोहळा (दि. २८) मार्च रोजी होणार होता. कार्यक्रमाची जय्यत तयारीही झाली. कोनशिलाही मोठ्या थाटात लावण्यात आली होती. परंतू अधिकाऱ्याच्या वृक्षतोडीच्या कारनाम्यामुळे मुख्य कार्यकारी आधिकारी, आमदार, खासदार व मान्यवर न आल्याने हा उद्धाटनाचा कार्यक्रम होऊ शकला नसल्याची चर्चा मात्र तालुकाभर चांगलीच रंगली आहे.

सुशोभिकरणाच्या नावाखाली पंचायत समितीच्या या आधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी वडाची मोठी दोन झाडे व इतर झाडे तोडून त्याची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावल्याने शिरुरच्या नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी आधिकाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास नाथा पाचर्णे हे येत्या ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाच्या तयारीत आहेत.

या विषयी पंचायत समीतीच्या आधिकाऱ्याबरोबर असणारे कर्मचारी यशवंत वाटमारे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की वृक्षतोडीबाबत मला काहीही माहीती नसून रात्रीच्या वेळी साहेबांचा अचानक फोन आल्याने मी उपस्थित झालो होतो. या विषयी गटविकास आधिकारी अजित देसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, मी फक्त वडाच्या फांदया छाटल्या आहेत,असे मोघम उत्तर त्यांनी दिले आहे.

परंतू वडाच्या झांडाबरोबर तेथील इतर झाडे बुंध्यापासून कापलेली दिसत आहे. ही झाडे कोणाला व किती पैश्यात विकली…? त्याची कोणत्या वाहनाने वाहतुक करण्यात आली…? याचा सखोल तपास करणे गरजेचे असून गटविकास आधिकारी अजित देसाई हे झांडाचे कसाई झाले असुन त्यांनी अनेक मुक्या पक्षांचा जीव घेतला आहे. या वडाच्या झाडाला वटपोर्णिमा सणाला महीलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी बांधलेले दोरे अजूनही त्या झाडाला तसेच राहीले आहेत. या आधिकाऱ्यावर तातडीने कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनिल जाधव, अविनाश घोगरे यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

42 मिनिटे ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

2 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

2 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

2 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

2 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

2 तास ago