पुणे: येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राज रावसाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव असुन या संदर्भात महाविधी लाँ स्टुडंटन्स असोसिएशन या विधी शाखेतील विद्यार्थ्यांकरिता काम करण्याऱ्या सामाजिक संस्थेकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
राज हा मूळचा बीड जिल्ह्यातील पाटसरा या गावचा सामान्य शेतकरी कुटुंबातील असून तो पुण्यात विधी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. अनेक सामाजिक उपक्रमात अग्रभागी राहून नियोजनात राजचा सक्रिय सहभाग होता. दि 9 मे 2023 रोजी राज राहत असलेल्या गोखले नगर भागातील विद्यार्थी सहाय्यक समिती या होस्टेल मध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज सारख्या विद्यार्थ्यांने असे टोकाचे पाऊल उचलावे ही मनाला पटणारी गोष्ट नाही. या मागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असले पाहिजे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे मुलाचे वडील रावसाहेब गर्जे यांनी फिर्याद दाखल केली आहे. तरीसुद्धा देखील अजून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
राज याने मृत्यूपुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निरुपम जयंत जोशी या विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. या विद्यार्थ्याला उसने पैसे देताना राजने मध्यस्थी केली होती. परंतु पुन्हा पैसे मागितल्यावर निरुपमने वारंवार नकार दिला. त्याने राजला पैसे न देता मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळून राजने आत्महत्या केली असल्याची शक्यता असुन या घटनेला 10 दिवस उलटूनही निरुपमला अटक झालेली नाही. निरुपमचे वडील जयंत जोशी हे देखील ज्येष्ठ वकील आहेत. त्यामुळे आरोपी अधिक काळ बाहेर राहिले तर पुरावे नष्ट करण्याचे आणि राजच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याचे प्रकार घडू शकतात.
त्यामुळे या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असुन अजून काही विद्यार्थ्यांची नावे या प्रकरणात येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी विविध स्तरावरून दबाब आल्याची आणि पैशाचा वापर केला गेल्याची सगळीकडे दबक्या आवाजात विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. याबाबत महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव अॅड प्रविण कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाला आपण यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन राजला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत निवेदन दिले आहे.
सदर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आम्हांला पोलीस स्टेशनसमोर संस्थेमार्फत आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावर पोलिस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यावेळी मालसा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नासिर पाटील आणि उपाध्यक्ष लखन दराडे उपस्थित होते.
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…