मुख्य बातम्या

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटवरुन गुन्हा दाखल

पुणे: येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राज रावसाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव असुन या संदर्भात महाविधी लाँ स्टुडंटन्स असोसिएशन या विधी शाखेतील विद्यार्थ्यांकरिता काम करण्याऱ्या सामाजिक संस्थेकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

राज हा मूळचा बीड जिल्ह्यातील पाटसरा या गावचा सामान्य शेतकरी कुटुंबातील असून तो पुण्यात विधी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. अनेक सामाजिक उपक्रमात अग्रभागी राहून नियोजनात राजचा सक्रिय सहभाग होता. दि 9 मे 2023 रोजी राज राहत असलेल्या गोखले नगर भागातील विद्यार्थी सहाय्यक समिती या होस्टेल मध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज सारख्या विद्यार्थ्यांने असे टोकाचे पाऊल उचलावे ही मनाला पटणारी गोष्ट नाही. या मागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असले पाहिजे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे मुलाचे वडील रावसाहेब गर्जे यांनी फिर्याद दाखल केली आहे. तरीसुद्धा देखील अजून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

राज याने मृत्यूपुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये निरुपम जयंत जोशी या विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. या विद्यार्थ्याला उसने पैसे देताना राजने मध्यस्थी केली होती. परंतु पुन्हा पैसे मागितल्यावर निरुपमने वारंवार नकार दिला. त्याने राजला पैसे न देता मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याच त्रासाला कंटाळून राजने आत्महत्या केली असल्याची शक्यता असुन या घटनेला 10 दिवस उलटूनही निरुपमला अटक झालेली नाही. निरुपमचे वडील जयंत जोशी हे देखील ज्येष्ठ वकील आहेत. त्यामुळे आरोपी अधिक काळ बाहेर राहिले तर पुरावे नष्ट करण्याचे आणि राजच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याचे प्रकार घडू शकतात.

त्यामुळे या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असुन अजून काही विद्यार्थ्यांची नावे या प्रकरणात येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी विविध स्तरावरून दबाब आल्याची आणि पैशाचा वापर केला गेल्याची सगळीकडे दबक्या आवाजात विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. याबाबत महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव अ‍ॅड प्रविण कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाला आपण यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन राजला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत निवेदन दिले आहे.

सदर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आम्हांला पोलीस स्टेशनसमोर संस्थेमार्फत आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावर पोलिस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यावेळी मालसा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नासिर पाटील आणि उपाध्यक्ष लखन दराडे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

1 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago