शिरूर (किरण शेलार): बाबुराव नगर, हायवे सेंटर रोड स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ अभिवादन यात्रा ही सिंदखेड राजा येथून सुरू होऊन रायगड पाचाड येथे सांगता होणारी एक प्रेरणादायी यात्रा बाबुराव नगरमध्ये उत्साहात पार पडली. या यात्रेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख हेतूंबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की, “जिजाऊंचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येक महिला जिजाऊ बनली पाहिजे.” या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती जिजाऊंच्या माहेरकडील ११व्या वंशज श्री. शिवाजीराजे जाधव यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शिरूर येथील जिजाऊप्रेमी महिला एकत्र जमून जिजाऊंच्या रथाचे पूजन केले. यावेळी अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचे स्मरण केले. उपस्थित महिलांनी एकजुटीचा संदेश देत जिजाऊंच्या कार्यावर आधारित “प्रत्येक महिला ही जिजाऊ झाली पाहिजे” असा संदेश दिला.
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी “जय जिजाई, जय शिवराय” अशा घोषणा दिल्या व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले काही प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे:
धनश्री मोरे, जिजाबाई दुर्गे, मंगल कोठावळे, शितल शर्मा, गीता आढाव, सारिका नागवडे, सविता कासार, श्रीमंदिलकर काकू, अर्चना भागवत, जाधव काकू, पाचर्णे ताई, आणि बाबुराव नगर येथील अनेक महिला, गणेश देशमुख, शामकांत वरपे, राहुल भागवत, गणेश गव्हाड, व इतर मान्यवर उपस्थिती होते. या अभिवादन यात्रेमुळे जिजाऊंच्या विचारांची नवचैतन्याने उभारणी होत असून महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.
लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…
मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…
सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…