मुख्य बातम्या

अपंगात्वावर मात करत ‘ते’ सांभाळतात महसुल विभागाचा महत्वाचा कारभार

शिरुर (अरुणकुमार मोटे): लहानपणीच आलेले अपगंत्व पण काहीतरी करून दाखवायचेच या प्रबळ इच्छेमुळे अफाट इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपगांत्वावर मात करत शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक वर्षापासून महत्वाच्या विभागात निलेश खोडसकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. अतिशय उत्कृष्ठरीत्या कामकाज करत असल्याने नुकतेच त्यांना महसुलदिनाच्या निमित्त औचित्य साधून प्रांतआधिकारी हरेश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसिलदार स्नेहागिरीगोसावी यांच्या हस्ते गौरव चिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

खोडसकर हे मुळचे नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कंधार गावचे रही वाशी असून शासकीय नोकरी निमित्ताने त्यांना शिरुर तहसिल कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी पुरवठा अव्वल कारकून म्हणूण ७ वर्ष कामकाज पाहीले. आता इंदिरा गांधी योजना अव्वल कारकूनाचा मुळ पदभार साभांळत असून त्याचबरोबर अतिरीक्त सेतू, कुळ कायदा अव्वल कारकून, कुळकायदा हिशोबी अव्वल कारकून, वतन इ. पदभार ते व्यवस्थित रीत्या साभांळत असून आदर्शवत कामकाज करत आहे. इतर अपंग व्यक्तींसाठी ते एक आदर्श व्यक्तीमत्व असून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण आकाशालाही गवसणी घालू शकतो याचे ते मुर्तिमंत उदाहरण आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago