मुख्य बातम्या

अपंगात्वावर मात करत ‘ते’ सांभाळतात महसुल विभागाचा महत्वाचा कारभार

शिरुर (अरुणकुमार मोटे): लहानपणीच आलेले अपगंत्व पण काहीतरी करून दाखवायचेच या प्रबळ इच्छेमुळे अफाट इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अपगांत्वावर मात करत शिरूर तहसिल कार्यालयात गेले अनेक वर्षापासून महत्वाच्या विभागात निलेश खोडसकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. अतिशय उत्कृष्ठरीत्या कामकाज करत असल्याने नुकतेच त्यांना महसुलदिनाच्या निमित्त औचित्य साधून प्रांतआधिकारी हरेश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसिलदार स्नेहागिरीगोसावी यांच्या हस्ते गौरव चिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

खोडसकर हे मुळचे नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यातील कंधार गावचे रही वाशी असून शासकीय नोकरी निमित्ताने त्यांना शिरुर तहसिल कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी पुरवठा अव्वल कारकून म्हणूण ७ वर्ष कामकाज पाहीले. आता इंदिरा गांधी योजना अव्वल कारकूनाचा मुळ पदभार साभांळत असून त्याचबरोबर अतिरीक्त सेतू, कुळ कायदा अव्वल कारकून, कुळकायदा हिशोबी अव्वल कारकून, वतन इ. पदभार ते व्यवस्थित रीत्या साभांळत असून आदर्शवत कामकाज करत आहे. इतर अपंग व्यक्तींसाठी ते एक आदर्श व्यक्तीमत्व असून जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण आकाशालाही गवसणी घालू शकतो याचे ते मुर्तिमंत उदाहरण आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago