मुख्य बातम्या

पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारतगॅस कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाने संबंधित रस्त्याचे प्रत्यक्ष काम हाती घेतले असुन त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योजक श्रीपाद जगताप यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण छेडण्यात आले होते. या आंदोलनाला जातेगाव खुर्द, करंदी व सणसवाडी ग्रामपंचायत तसेच परिसरातील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन निधी उपलब्ध करुन रस्त्याचे काम लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर गेल्या दोन दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली आहे. आय ओके महाविद्यालय ते भारतगॅस कारखाना या दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्ता करण्यात येणार असुन यासाठी तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

 

सध्या सुरु असलेल्या कामाची पाहणी उद्योजक श्रीपाद जगताप, बापू जगताप, सुभाष जगताप, शरद जगताप, शाम बेंडभर, शाहजी तांबे व सुरेश जगताप यांनी केली. खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

 

“या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्ता अक्षरशः चाळण झाला होता. प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. आज काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने आम्ही समाधानी आहोत.”

श्रीपाद जगताप (आंदोलक) 

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

Video; रांजणगाव महागणपती चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

4 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

4 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

4 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

21 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

21 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

21 तास ago