Shivajirao Adhalrao Patil
शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत झाला आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
शिरुर मतदार संघात महायुती सध्या कोण उमेदवार देणार याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र त्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आज आढळराव पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘शिरूर लोकसभा मतदार संघ गेली आठवडाभर चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार येथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्ते ही म्हणतायेत, की राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे.’
शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे खुले आव्हान अजित पवार यांनी दिले आणि त्याच दिवसापासून या मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या. महायुतीत याच मतदार संघासाठीट रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि याच मतदार संघातील महत्वाचे नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदार संघावरुन खलबतं झाली आणि अजित पवार यांनी या ठिकाणी दबावाचे राजकारण केल्याचे बोललं जात आहे. आता कार्यकर्त्यांनीदेखील आणि आढळराव यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे. पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होईल.
शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…
शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?
शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…
अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…
मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…
दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील
राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील
मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…