मुख्य बातम्या

शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

शिरूर (तेजस फडके) : जमिनीचा पंचनामा तक्रारदाराच्या बाजूने करुन देण्यासाठी आधी १० हजारांची मागणी केली. अखेर ७ हजारांवर सौदा झाल्यानंतर न्हावरे चौकात एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. ग्राम महसूल अधिकारी प्रमीला नागेश वानखेडे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी लाच लुचपत विभागाचे (एसीबी) पुण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश बाबासाहेब घरबुडे यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली आहे. आरोपी वानखेडे या शिरसगाव काटा (ता. शिरुर, जि. पुणे) येथे कार्यरत असून त्यांनी तक्रारदाराच्या जमिनीचा पंचनामा ‘अनुकूल’ करुन देण्यासाठी तसेच पुढेही मदत करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे.

एसीबीच्या पडताळणीत पंचासमक्ष लाच मागणी स्पष्ट झाली. १६ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजी चौक, न्हावरे–तळेगाव रोड येथे ठरल्याप्रमाणे ७ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. सरकारी पदाचा गैरवापर करुन आर्थिक लाभ घेतल्याचे पुरावे मिळाल्याने आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोलिस उपअधीक्षक भारती मोरे (एसीबी, पुणे) या करीत आहेत.

शिरुर महसुल विभाग पुन्हा रडारवर…
या कारवाईमुळे शिरुर तालुक्यात खळबळ उडाली असुन महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड झाला आहे. शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात अवैध मुरुम उपसा तसेच वाळू उपसा चालु असुन याकडे स्थानिक महसूलचे अधिकारी तसेच कर्मचारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

5 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago