मुख्य बातम्या

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

पुणे : मी अजित पवार यांच्या सोबत जातोय या चर्चांना अजून वेळ आहे, जागावाटप झाल्यावर ठरवू असे, शिरुर मतदारसंघातील शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला शिरूरची जागा आली तर आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटामध्ये असल्याने त्यांचा पराभव करणार म्हणजे करणार असे आव्हान अजित पवार यांनी दिले आहे. या ठिकाणचा खासदार आपण निवडून आणणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आढळराव पाटील काय करणार? याची चर्चा सुरू झाली होती.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, ‘महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून शिरूर लोकसभेचा उमेदवार कोण हे ठरवतील. मात्र मी अजून एकदा ही बोललो नाही की मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातोय. जागांचं वाटप झाल्यावर ठरवू.’

दरम्यान, अमोल कोल्हे यांना या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असा निश्चय अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले की, ‘एका खासदाराने आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं. आता त्यांचं चाललंय सगळं. पण मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशा गोष्टी त्यांनी येऊन सांगितल्या.’

अजित पवार पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात; म्हणाले…

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

42 मिनिटे ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

1 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

2 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

2 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

6 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

6 तास ago