मुख्य बातम्या

शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने स्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ संपन्न

शिरुर: आजकाल मोबाईलच्या जमान्यात महिलांनी मुलींना मोबाईल हातात देताना खुप काळजी घेणं गरजेचं असुन अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आपली ऑनलाईन फसवणूक होत असते असे मत शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांनी व्यक्त केले. शिरुर येथील जुन्या नगर पालिकेच्या कार्यालयात प्रथमच शिरुर पोलिस स्टेशन, भरोसा सेल आणि शिरुर महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिलांसाठी स्नेहमेळावा तसेच हळदीकुंकू समारंभानिमित्त कौटुंबिक हिंसाचार आणि महिला विषयक कायदे याबाबत मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी बोलताना शिरुर पोलिस स्टेशन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या महिलांचा स्नेह मेळावा आयोजित करणे हे फक्त एक निमित्त असते. यामुळे सर्व महिला एकत्रित येतात आणि यातूनच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. महिलांचे कायदे याची माहिती मिळते. दररोज घरातील जबाबदारी पेलवत असताना थोडा वेळ ती स्वतः ला देते. यातूनच त्यांना आनंद मिळतो. तसेच महिला दक्षता समिती नेहमीच महिलांच्या समस्या सोडवून त्यांना आधार देण्याचे काम करत असते. यावेळी महिलांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वान म्हणून त्यांना गुलाबाची रोपे भेट देण्यात आली.

यावेळी शिरुर पोलीस स्टेशनच्या महीला पोलिस कर्मचारी रेखा टोपे, प्रतिमा नवले, शोभा ससे, सुवर्णा नरवडे, अर्चना यादव, भाग्यश्री जाधव तसेच महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा शशिकला काळे, सदस्या सुवर्णा सोनवणे, जया खांडरे, वैशाली गायकवाड, पत्रकार किरण पिंगळे, सामाजिक सुरक्षा कक्षच्या शोभना पाचंगे, अ‍ॅड सिमा काशीकर, अ‍ॅड सरिता खेडकर,डॉ स्मिता कवाद, सुषमा शितोळे, सारिका वीर्सेव, ज्योती हांडे, कविता वाटमारे, ललिता पोळ, प्रियंका धोत्रे, प्रतीक्षा पवार, आजी-माजी नगरसेविका, सरपंच, सदस्या,सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शर्मिला नीचीत यांनी तर आभार राणी कर्डिले यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

5 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

5 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

5 तास ago