महाराष्ट्र

हिंदू जनआक्रोश मोर्चातील भडकाऊ भाषणांवर कारवाई करा…

समाजात द्वेष पसरवणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगीच कशी दिली?

मुंबई: मुंबईत २९ जानेवारी रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या रॅलीमध्ये द्वेषपूर्ण आणि भडकावणारी भाषणे करुन खोटी माहिती व अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत भडकाऊ भाषण देऊन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

हुसेन दलवाई यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या बॅनरखाली कार्यक्रम आयोजनामागे सकल हिंदू समाज आणि त्यांच्या घटक संघटना हे काम करीत असतात. मुंबईत दादरच्या मोर्चामध्ये तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि बाहेरुन आलेले कोणी आमदार यांनी देखील भाग घेऊन समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. समाजात इतका द्वेष पसरवणारे कार्यक्रम ताबडतोबीने रोखणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित, मुस्लिम, कुणबी आणि इतर निरनिराळ्या ओबीसी जाती यांना सामावून घेवून अतिशय आदर्श असे राज्य निर्माण केले, त्या शिवाजी महाराजांचे नाव घेऊन समाजात द्वेष पसरवल्यामुळे त्यांची देखील बदनामी केली जात आहे. हे सर्व दिसत असताना मुंबई पोलीसांनी मात्र मोर्चाला परवानगी दिली व बघाची भूमिका घेतली. महाराष्ट्राची परंपरा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची आहे. त्या परंपरेला तडा जाणारी ही बाब असून यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे, असे दलवाई म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

6 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

6 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

6 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

6 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

6 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

6 तास ago