शिरुर (तेजस फडके): साधारण दुपारी 4:30 ची वेळ…अहमदनगर-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे दुचाकीवर निघालेल एका दक्षिण भारतीय जोडप्याच्या जातेगावच्या घाटात अपघात झाला. त्यातील महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली. परंतु त्या जोडप्याला मदत करण्यासाठी मात्र त्या गर्दीतून कोणीही पुढे येईना. त्यावेळी रांजणगाव गणपती गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे हे नगरवरुन रांजणगावला जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या गाडीत “त्या” जखमी महिलेला उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे शनिवार (दि 22) रोजी रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक संदीप कुटे हे अहमदनगर येथे काही कामानिमित्त गेले होते. नगर येथील काम उरकल्यानंतर रांजणगावकडे परत येत असताना साधारण दुपारी 4:30 च्या दरम्यान सुप्याच्या पुढे नगर-पुणे महामार्गावर जातेगांव घाटात कुटे यांना लोकांची गर्दी दिसली. यावेळी कुटे यांनी गाडीच्या खाली उतरुन पाहिले असता साधारण 30 ते 35 वर्ष वय असलेल्या दक्षिण भारतीय जोडप्याचा अपघात झाला होता. त्यातील महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.
परंतु बघ्यांची गर्दीत या जोडप्याला मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं. अशा वेळेस त्या महिलेला वेळेवर उपचार मिळणं गरजेचं होत. त्यामुळे संदीप कुटे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने स्वतःच्या चारचाकी गाडीत या महिलेला बसवले आणि शिरुर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्या अपघातग्रस्त महिलेला वेळेवर उपचार मिळाले.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…