शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील हॉटेल तिरंगा समोर आज (दि 18) रोजी पहाटे 5 च्या सुमारास तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, प्रहार संघटनेचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर हे रांजणगाव येथुन शिक्रापुरकडे जात असताना त्यांना रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तत्काळ अपघातग्रस्त जखमींना नागरिकांच्या मदतीने वाहनाबाहेर सुरक्षित काढले अन जखमींची अवस्था लक्षात घेता तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान या अपघातामुळे पुणे-नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हि कोंडी सोडवण्यासाठी तसेच अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बांगर, ढाकुलकर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत आली.
शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या वतीने संदीप ढाकुलकर व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे तत्परतेबद्दल आभार मानण्यात आले. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुणे-नगर महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन
शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…
Video: शिरूरचे दोन्ही आजी-माजी आमदारांनी गुनाट गावाला भेट देत केली गारपिटीची पाहणी…
शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…
शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…
मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…
मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…
मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…