शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सावित्रीच्या लेकी आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.त्यांचे हे समाजकार्य अविरत चालु रहावे. तसेच त्यांची प्रेरणा इतर महिला शिक्षकांना मिळावी म्हणून ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५’ देण्यात आला. यावेळी एक महिला शिक्षिका करत असलेल्या चांगल्या कार्यास अजुन प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार देण्यात आल्याचे रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी सांगितले.
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच इतर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिरुर येथील ज्ञानगंगा शाळा बाबुरावनगर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रथम ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानगंगा शाळेच्या सर्वेसर्वा अमृता घावटे, घावटे सर, डॉ वैशाली साखरे, डॉ स्मिता कवाद, गिता आढाव ,इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी मानले.
रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण
शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…