शिरुर (प्रतिनिधी) शिरुर तालुक्याच्या पत्रकारितेच्या आणि डिजिटल माध्यमांच्या इतिहासात अभिमानाचा क्षण म्हणजे www.shirurtaluka.com या वेबसाईटचे १५ व्या वर्षात पदार्पण. माहिती, बातम्या आणि लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे व्यासपीठ गेली पंधरा वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.
२६ मे २०११ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील विधानभवनात या वेबसाईटचे प्रकाशन झाले. त्या क्षणापासून सुरु झालेला हा प्रवास आज १५ वर्षे पुर्ण करुन अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे. हि केवळ वेबसाईट नाही, तर शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षांना अभिव्यक्त करणारे प्रभावी माध्यम बनले आहे.
या १५ वर्षांच्या वाटचालीत वेबसाईटने अनेक सामाजिक, शैक्षणिक, विकासकामांशी संबंधित आणि जनहिताचे विषय मार्गी लावले. वेबसाईटच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात पुढे करता आला. अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमाने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे www.shirurtaluka.com ही वेबसाईट शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
या वेबसाईटची मोठी वाचकसंख्या, तसेच सोशल मीडियावर असलेला प्रचंड प्रतिसाद आणि फॉलोअर्सची संख्या हीच तिच्या विश्वासार्हतेची आणि लोकप्रियतेची साक्ष आहे. शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावागावांपर्यंत पोहोचणारे हे माध्यम आज तालुक्याच्या जनतेचा विश्वासू साथीदार बनले आहे.
या यशामागे वेबसाईटचे मुख्य संपादक संतोष धायबर, कार्यकारी संपादक संपत कारकुड, संपादक तेजस फडके आणि उपसंपादक किरण शेलार-पिंगळे तसेच अरुणकुमार मोटे, अर्जुन शेळके, अक्षय टेमगिरे, सुनिल जिते, ओंकार भोरडे, योगेश शेंडगे यांच्यासह सर्व पत्रकारांची अथक मेहनत, निष्ठा आणि पत्रकारितेप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हे व्यासपीठ आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहे.
www.shirurtaluka.com च्या १५ व्या वर्षपूर्ती निमित्त आमच्या सर्व वाचकांचे मनःपुर्वक अभिनंदन यापुढील वाटचालही अशीच यशस्वी, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी राहिल याची आम्हाला खात्री आहे. १५ व्या वर्षपूर्ती निमित्त लवकर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…