मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात गांजा बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे 40 हजार रुपयांचा गांजा बाळगल्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक केले असुन त्यांच्याकडुन दोन किलो गांजा जप्त केला आहे. शेमसुद्दीन रसिद शखे (वय 23) रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. माडव, ता.पाथर्डी, जि.अ.नगर. (2) लता दिलीप पवार (वय 45) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. सोनेसांगवी, ता. शिरुर, जि.पुणे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. 21) रोजी रात्री 9 च्या सुमारास कारेगाव येथील कोहकडे हॉस्पिटलच्या पाठीमागील पोटे यांच्या बिल्डींग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये शेमसुद्दीन शखे आणि लता पवार या दोघांकडे 40 रुपये किंमतीचा एकुण 2 किलोग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे निदर्शनास आल्याने त्या दोघांविरुद्ध रांजणगाव MIDC चे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.

 

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

15 तास ago