शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावातील टेमकरवस्ती येथे गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येथील एका शेतकऱ्याची कांदाचाळ पेटविल्याने लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत सुभाष संभाजी भोसले (वय 55) टेमकर वस्ती, टाकळी हाजी ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष भोसले हे टाकळी हाजी येथे टेमकर वस्ती येथे राहत असुन त्यांनी कांदाचाळीत विक्रीसाठी साठवलेला कांदा गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या उद्देशाने पेटवून दिल्याने त्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार मांडगे हे करत आहेत.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…