शिरुर (तेजस फडके): शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी गावातील टेमकरवस्ती येथे गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येथील एका शेतकऱ्याची कांदाचाळ पेटविल्याने लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत सुभाष संभाजी भोसले (वय 55) टेमकर वस्ती, टाकळी हाजी ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष भोसले हे टाकळी हाजी येथे टेमकर वस्ती येथे राहत असुन त्यांनी कांदाचाळीत विक्रीसाठी साठवलेला कांदा गुरुवार (दि 1) रोजी दुपारी 4 च्या सुमारास कोणतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या उद्देशाने पेटवून दिल्याने त्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार मांडगे हे करत आहेत.
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…
पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…
डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…