मुख्य बातम्या

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालणाऱ्या वाळू माफियांनी घोड धरण अक्षरशः ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातील अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी तीन वेळा फोडूनही वाळू माफियांचे वाळू चोरण्याचा सपाटा चालुच आहे.

याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत वेळोवेळी सडेतोड बातम्या केल्या होत्या. त्यानंतर महसुल विभागाने कारवाई करत सलग तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या. त्यानंतर काही दिवसातच वाळू माफिया पुन्हा धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळूची चोरी करतात. प्रशासनाकडून तीन वेळा कारवाई होऊनही वाळू माफिया त्यांना “जमत असेल तर थांबवून दाखवा” असे सरळसरळ आव्हान देत आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे.

या धरणातील वाळू उपसा केवळ बेकायदेशीरच नाही तर धरणाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा आहे. हे धरण पुर्णपणे मातीचे धरण असुन भविष्यात पाण्याच्या साठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीही काही स्वयंघोषित राजकीय पुढारी आणि वाळू माफियांच्या मिलीभगतीमुळे वाळू उपसा बेधडक सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या बेकायदेशीर वाळू उपशामुळे घोड धरणाच्या कडेला राहणारे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींचा रोष वाढत असुन, “तीन वेळा बोटी फोडल्या तरीही माफिया थांबत नसतील, तर कुणाच्या आशिर्वादाने हा धंदा सुरु आहे…?” असा थेट सवाल ते प्रशासनाला विचारत आहेत. आता या माफियांवर खर्‍या अर्थाने कारवाई होणार का…? की घोड धरणातील वाळूचा ‘सोनेरी धंदा’ असाच सुरु राहणार…? या प्रश्नावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

(क्रमश:) 

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

3 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

3 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

4 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

4 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

4 तास ago

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

6 तास ago