रांजणगाव गणपती (तेजस फडके) मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या विरोधात तीव्र निषेध होईल, असा बॅनर लावुन इशारा देण्यात आला आहे.
सध्या मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु असून, मराठा समाजाच्या हक्कासाठी हजारो समाजबांधव तळ ठोकून बसले आहेत. अनेक आमदार-खासदार उपोषणस्थळी हजेरी लावून आपली भूमिका जाहीर करीत आहेत. परंतु काही लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने त्यांच्या मतदारसंघात असंतोषाची ठिणगी पडू लागली आहे.
रांजणगावातील या फलकामुळे स्थानिक पातळीवरही वातावरण पेटू लागले आहे. आरक्षणाच्या लढ्यात जनतेला आपल्या प्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे स्पष्ट संकेत समाजातून मिळत आहेत. “जनतेच्या प्रश्नावर मौन धरणाऱ्या नेत्यांना मतदारसंघ माफ करणार नाही,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.
मराठा आरक्षणावर आता राजकीय नेत्यांची कसोटी लागली असून, रांजणगाव गणपतीत लागलेले फलक हीच त्याची सुरुवात असल्याचे चित्र दिसत आहे.
२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…
1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…