आरोग्य

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे सुकण्यास अडचण येते, त्यामुळे बऱ्याचदा ओलसर कपडे वापरण्यात येतात. परंतु हे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कारण असे की, ओलसरपणा हे बुरशीचे प्रजननस्थळ आहे. येथे बुरशी अतिशय झपाट्याने वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो ओलसर कपड्यांमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या जाणवते. हे इन्फेक्शन सामान्यतः त्वचा, केस, नखे तसेच तोंडाचा आतील भाग यावर बघण्यास मिळते.

फंगल इन्फेक्शन

बुरशीमुळे होणाऱ्या आजाराला फंगल इन्फेक्शन म्हणतात. ते कसे दिसते आणि ते तुमच्या शरीरावर कुठे आहे, यावरून डॉक्टर सहसा त्याचे निदान करू शकतात. बुरशीजन्य त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी, अँटीफंगल औषधे घेणे गरजेचे ठरते.

पावसाळ्यात काळजी घ्या 

पावसाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. पावसाने कपडे ओलसर होणार नाहीत याची काळजी घ्या. पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे ओठ निस्तेज आणि कोरडे पडू शकतात. अशा वेळी पावसाळ्यात ओठांवर लिप बाम लावावा. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी घ्यावे. अति मेकअप करू नये. दिवसभरात दोन तीन वेळा चेहरा धुवा. त्वचा कोरडी ठेवा, पावसात भिजू नका. भिजल्यास अंग, केस चांगले कोरडे करा. ओले कपडे परिधान करू नये. आहार संतुलित असला पाहिजे. असे केल्यास त्वचेची योग्य प्रकारे काळजी राखली जाते.

संसर्गजन्य आजार

फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य आजार आहे. तो कुटुंबात एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांचे कपडे वापरू नये. रुग्णांचे कपडे वेगळे ठेवावे. फंगल इन्फेक्शनवरील उपचारांसाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

4 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

5 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

5 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

6 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

6 तास ago