Minolta DSC
अम्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला वा तोंडात छाले निर्माण होण्याचा त्रास अनेकांना होत असतो. त्यामुळे तिखट खारट खाल्ले की खूप त्रास होतो. काहीही लावले तरीही आराम पडत नाही अशावेळी चमेली पानांचा काढा करून तोंडात धारण करावा लगेच आराम पडतो. चमेली पानं वाटून व्रणांवर लावावे. दात दुखत असतील तर चमेली पत्र चावावीत.
चमेलीची पाने उत्तम व्रणरोपक म्हणजेच जखमा भरून काढते. चमेलीपत्रसिद्ध तेल लावावे. चमेलीपत्र कुष्ठघ्न आणि कण्डूघ्न सांगितले आहे. शरीरावर खाज सुटत असेल किंवा त्वचारोग असेल तर चमेली पत्र वाटून त्याचा लेप लावावा. खाज सुटणे कमी होते. अनेक त्वचारोग उदा. एक्जीमा, फंगल इन्फेक्शन इ. मधे चमेलीपत्रसिद्ध तेल अथवा पानांचा मूळाचा लेप लाभदायक ठरतो.
डोकेदुखी असेल तर चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात. शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दौर्बल्यात चमेली तेलाने डोक्याला मालिश केल्याने आराम मिळतो.
थंडीमुळे किंवा पाण्यात सतत काम करण्याने तळपायाला भेगा पडतात अशावेळी चमेलीची पाने वाटून लेप भेगांवर लावावा जखमा लवकर भरतात चमेलीपत्र सिद्ध तेलाने हळूहळू मालीश करावी त्यामुळे तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत होतात.
कान दुखणे कानात स्त्राव निघणे अशा तक्रारींवर पानांनी सिद्ध तेल कानात टाकल्यास त्रास कमी होतो.
मासिक स्त्राव व्यवस्थित होत नसेल किंवा अवरोध असेल तर पत्र व पुष्प लेप ओटीपोटावर लावतात.
अतिकाम किंवा कमी झोप यामुळे चिडचिडेपणा मानसिक अस्वस्थता जाणवते. अशावेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. अरोमाथेरपी प्रमाणे याचा उपयोग होतो. चमेली पुष्प वाजीकर आहेत. या फुलांचा सुगंध वाजीकरण करणारा आहे.
रक्तविकारांवर चमेली खूप प्रभावी कार्य करते. अनेक औषधी कल्पांमधे चमेलीचा वापर करण्यात येतो. जात्यादी तेल जात्यादी घृत इ. चमेली वापरून केलेली औषधी कल्प आहेत. गंडूष चिकित्सा, लेप, कवलधारण, मालीश तसेच आभ्यंतर सेवनाकरीता वैद्य चमेली कल्पांचा वापर करत करतात. अशी ही चमेली उत्तम त्वक् रोगहर मुखरोगहर व्रण रोपक व याची फुले उत्तम वाजीकर व सौमनस्यजनन करणारे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…