आरोग्य

मन स्थिर करणारं आसन भद्रासन

सर्वात श्रेष्ठ अशी चार आसने आहे, ती म्हणजे सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. यातील भद्रासन हे शरीराला तणाव देणाऱ्या आणि पायांची नसे खेचणाऱ्या आसना पैकी एक महत्त्वाचे आसन आहे.

सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे आणि दोन्ही पाय हळूहळू आपल्या जवळ खेचावे. हातांची बोटे एकमेकांत गुंफून हातांच्या ओंजळीने पावले घट्ट पकडून ठेवावी. जेणे करून पावले पुढे सरकून पकड आणि मांड्यांवरचा तणाव ढीला पडणार नाही आणि मांड्यांच्या नसांना चांगल्या प्रकारे ताण मिळू शकेल.

पायाचे तळवे जास्तीत जास्त जवळ घ्यावेत. थोडावेळ मन शांत करून स्थिर बसावे. त्या नंतर फुलपाखरू जसे आपले पंख फडफडविते त्याप्रमाणे मांड्या वर-खाली कराव्यात. आसनाचे नाव जरी भद्रासन असले तरी या क्रियेमुळे याला ‘बटरफ्लाय पोज’ असेही म्हणतात. थोड्या वेळानंतर मांड्या स्थिर कराव्यात. नमस्कार करावा आणि हात पर्वतासन प्रमाणे उंच खेचून ठेवावेत. डोळे बंद करावेत.

भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे. दीर्घ श्वसन करून ओंकार उच्चार करावा आणि त्यानंतर पाठीचा कणा शक्य तितका ताठ ठेवून सावकाशपणे खाली वाकावे आणि कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. हात पुढे सोडावेत. हळूहळू खाली वाकून हाताची कोपरे सर्वप्रथम जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. या संपूर्ण क्रिये मध्ये पायांतील मुख्यत्वे मांडीच्या नसांना अतिशय चांगला तणाव मिळतो. त्यामुळे थोडी वेदना पायाच्या मांड्यांमध्ये आणि शिवणी मध्ये होऊ शकते. ती वेदना सहन करावी. मन शांत ठेवावे. उच्छ्वासा बरोबर आणखी खाली वाकायचा प्रयत्न करावा. हळूहळू खाली वाकून कपाळ जमिनीला लावावे. शक्य झाल्यास हनुवटी जमिनीला लावावी. या आसनाला भद्रासन असे म्हणतात. हे आसन करावयास कठीण असल्यामुळे या आसनाला ‘गोरक्षासन’ असेही म्हटले आहे. काहीजण या आसनाला ‘बद्धकोण’ आसन या नावानेही ओळखतात. प्राचीन काळामध्ये या आसनाला काही ठिकाणी ‘ब्रह्मचर्यासन’ असेही म्हणतात.

भद्रासन मध्ये मांड्यांमधून गेलेल्या नसांना अतिशय उत्तम ताण मिळतो. पाठीचा कणा आणि कंबरेला चांगला ताण मिळतो. शरीरामध्ये लवचिकता येते. हा ताण मिळाल्यामुळे मन शांत, स्थिर होते. या आसनामुळे शरीरातील अनेक नाड्यांची शुद्धी होते आणि अनेक प्रकारचे रोग दूर होतात. या आसनाच्या अभ्यासामुळे मनाला येणारा थकवा दूर होतो. या आसनामध्ये मूलबंध साधला जातो. याचा थेट परिणाम हा सप्ताचक्रांतील मूलाधार चक्रावर होतो. हे चक्र आपले गुदद्वार आणि जननेंद्रिय यांच्या मध्ये असलेल्या शिवणीच्या थोडे वर असते. मनोव्यापार आणि त्यातील तरंगांचे उगमस्थान मूलाधार चक्रातून आहे. भद्रासनाच्या अभ्यासाने मन स्थिर, एकाग्र होते, तसेच चित्तवृत्ती नियंत्रित होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

10 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago