सर्वात श्रेष्ठ अशी चार आसने आहे, ती म्हणजे सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. यातील भद्रासन हे शरीराला तणाव देणाऱ्या आणि पायांची नसे खेचणाऱ्या आसना पैकी एक महत्त्वाचे आसन आहे.
सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे आणि दोन्ही पाय हळूहळू आपल्या जवळ खेचावे. हातांची बोटे एकमेकांत गुंफून हातांच्या ओंजळीने पावले घट्ट पकडून ठेवावी. जेणे करून पावले पुढे सरकून पकड आणि मांड्यांवरचा तणाव ढीला पडणार नाही आणि मांड्यांच्या नसांना चांगल्या प्रकारे ताण मिळू शकेल.
पायाचे तळवे जास्तीत जास्त जवळ घ्यावेत. थोडावेळ मन शांत करून स्थिर बसावे. त्या नंतर फुलपाखरू जसे आपले पंख फडफडविते त्याप्रमाणे मांड्या वर-खाली कराव्यात. आसनाचे नाव जरी भद्रासन असले तरी या क्रियेमुळे याला ‘बटरफ्लाय पोज’ असेही म्हणतात. थोड्या वेळानंतर मांड्या स्थिर कराव्यात. नमस्कार करावा आणि हात पर्वतासन प्रमाणे उंच खेचून ठेवावेत. डोळे बंद करावेत.
भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे. दीर्घ श्वसन करून ओंकार उच्चार करावा आणि त्यानंतर पाठीचा कणा शक्य तितका ताठ ठेवून सावकाशपणे खाली वाकावे आणि कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. हात पुढे सोडावेत. हळूहळू खाली वाकून हाताची कोपरे सर्वप्रथम जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. या संपूर्ण क्रिये मध्ये पायांतील मुख्यत्वे मांडीच्या नसांना अतिशय चांगला तणाव मिळतो. त्यामुळे थोडी वेदना पायाच्या मांड्यांमध्ये आणि शिवणी मध्ये होऊ शकते. ती वेदना सहन करावी. मन शांत ठेवावे. उच्छ्वासा बरोबर आणखी खाली वाकायचा प्रयत्न करावा. हळूहळू खाली वाकून कपाळ जमिनीला लावावे. शक्य झाल्यास हनुवटी जमिनीला लावावी. या आसनाला भद्रासन असे म्हणतात. हे आसन करावयास कठीण असल्यामुळे या आसनाला ‘गोरक्षासन’ असेही म्हटले आहे. काहीजण या आसनाला ‘बद्धकोण’ आसन या नावानेही ओळखतात. प्राचीन काळामध्ये या आसनाला काही ठिकाणी ‘ब्रह्मचर्यासन’ असेही म्हणतात.
भद्रासन मध्ये मांड्यांमधून गेलेल्या नसांना अतिशय उत्तम ताण मिळतो. पाठीचा कणा आणि कंबरेला चांगला ताण मिळतो. शरीरामध्ये लवचिकता येते. हा ताण मिळाल्यामुळे मन शांत, स्थिर होते. या आसनामुळे शरीरातील अनेक नाड्यांची शुद्धी होते आणि अनेक प्रकारचे रोग दूर होतात. या आसनाच्या अभ्यासामुळे मनाला येणारा थकवा दूर होतो. या आसनामध्ये मूलबंध साधला जातो. याचा थेट परिणाम हा सप्ताचक्रांतील मूलाधार चक्रावर होतो. हे चक्र आपले गुदद्वार आणि जननेंद्रिय यांच्या मध्ये असलेल्या शिवणीच्या थोडे वर असते. मनोव्यापार आणि त्यातील तरंगांचे उगमस्थान मूलाधार चक्रातून आहे. भद्रासनाच्या अभ्यासाने मन स्थिर, एकाग्र होते, तसेच चित्तवृत्ती नियंत्रित होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…