आरोग्य

तळपायाची, हाताची सतत आग होणे कारणे व उपाय

1) नर्व्हस सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास.

2) मधुमेहाची शक्यता असल्यास.

3) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी.

4)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.

5) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.

6) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास.

7) रक्त वाहिन्या मध्ये संक्रमण झाल्यास.

8) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.

9) फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.

10) बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.

11) मद्यपानाचे व्यसन.

12) किडनी संबंधित आजार.

13) एखाद्या किटकाचा दंश.

उपाययोजना

1) गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.

2) नस्य (नाकात दोन दोन थेंब सोडणे).

3) एका मोठ्या टब मध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा-पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते. हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.

4) दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.

5) तुपाची तळपायांना मालिश व भीमसेन कापुर गरम पाण्यात घेतल्यास तात्काळ परिणाम येतो.

6) पायाला कोकम तेल लावायचं. हे तेल कोकणात मिळेल. हे तेल मळकट पांढऱ्या रंगाचं असुन सर्व साधारण खुप घट्ट असतं. हे तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध आहे.

7) कोहळा, पाव किलो साल काढुन, पांढरा दुधी पाव किलो साल काढुन, आवळा गर पाव किलो, आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.

8) शतधौत घ्रुत पायाला लावत जा.

9) धने-जीरे पाणी पीत जा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन

मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…

2 तास ago

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…

2 तास ago

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…

3 तास ago

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

3 तास ago

महा-ऑनलाईन सर्व्हर ठप्प; विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने…

4 तास ago

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

23 तास ago