आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला.
पण कधी सुंठ वापरता का
आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी वापरायलाच हवी.
पावसाळ्यात आल्याचा चहा तर पिताच मात्र सुंठीचा छान कडक चहा पावसाळ्यात पिणे फार फायद्याचे ठरेल. सर्दी खोकला ताप पावसाळ्यात नुसता थैमान घालतात. सुंठीचा चहा प्यायल्याने आजार आटोक्यात राहतात.
सुंठ उगाळून त्याचा लेप तयार करता येतो. हा लेप फार उपयुक्त असतो. अगदी गुणकारी असतो. त्यामुळे तो वापरणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. पाहा किती फायदे असतात.
सुंठीत अँण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात. ते वेदनाशामक असतात. त्यामुळे सुंठीचा लेप लावल्यामुळे हात, मान दुखत असल्यास आराम मिळतो. हा लेप स्नायूंसाठी फार उपयुक्त ठरतो.
वाताचा त्रास अनेकांना असतो. वातामुळे डोके दुखते. तसेच इतरही अनेक त्रास होतात. सुंठीचा लेप वात खेचून घेतो. तसेच पित्ताचा त्रास होत असेल तरी हा लेप डोकेदुखी थांबवण्यात मदत करतो.
सुंठीच्या लेपामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायु शरीराला जास्त मिळतो आणि त्यामुळे थकवा जास्त जाणवत नाही. त्यामुळे सर्दीने नाक बंद झाल्यावर असा लेप लावायचा. नाक सुटते.
सुंठीचा लेप तयार करायला अगदी सोपा आहे. त्यासाठी सुंठ उगाळायची. उगाळण्यासाठी पाणी वापरायचे. सुंठ पूड असेल तर थोड्या पाण्यात कालवायची आणि लावायची. हा लेप खास डोक्यालाच लावला जातो. झोपही छान लागते.
(सोशल मीडियावरून साभार)
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय…
शिरुर (तेजस फडके) घोडनदी (शिरुर) येथील चौथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम…
आपल्याला एखादी ऍलर्जी असेल किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर शरीर त्या गोष्टीच्या संपर्कात…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची…
कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि…
ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या…