आरोग्य

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध

आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला.

पण कधी सुंठ वापरता का

आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी वापरायलाच हवी.

पावसाळ्यात आल्याचा चहा तर पिताच मात्र सुंठीचा छान कडक चहा पावसाळ्यात पिणे फार फायद्याचे ठरेल. सर्दी खोकला ताप पावसाळ्यात नुसता थैमान घालतात. सुंठीचा चहा प्यायल्याने आजार आटोक्यात राहतात.

सुंठ उगाळून त्याचा लेप तयार करता येतो. हा लेप फार उपयुक्त असतो. अगदी गुणकारी असतो. त्यामुळे तो वापरणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. पाहा किती फायदे असतात.

सुंठीत अँण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात. ते वेदनाशामक असतात. त्यामुळे सुंठीचा लेप लावल्यामुळे हात, मान दुखत असल्यास आराम मिळतो. हा लेप स्नायूंसाठी फार उपयुक्त ठरतो.

वाताचा त्रास अनेकांना असतो. वातामुळे डोके दुखते. तसेच इतरही अनेक त्रास होतात. सुंठीचा लेप वात खेचून घेतो. तसेच पित्ताचा त्रास होत असेल तरी हा लेप डोकेदुखी थांबवण्यात मदत करतो.

सुंठीच्या लेपामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायु शरीराला जास्त मिळतो आणि त्यामुळे थकवा जास्त जाणवत नाही. त्यामुळे सर्दीने नाक बंद झाल्यावर असा लेप लावायचा. नाक सुटते.

सुंठीचा लेप तयार करायला अगदी सोपा आहे. त्यासाठी सुंठ उगाळायची. उगाळण्यासाठी पाणी वापरायचे. सुंठ पूड असेल तर थोड्या पाण्यात कालवायची आणि लावायची. हा लेप खास डोक्यालाच लावला जातो. झोपही छान लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

2 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

2 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

2 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

2 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

4 तास ago