आरोग्य

जेवण झाल्यानंतर हे नक्की करुन पहा…

1) जेवणानंतर एक चमचा भाजलेले तीळ आणि जवस खावे. पचनासाठी आणि कोलेस्टेरॉल साठी उपयुक्त असतात.

२) दोन चमचे धणे व दोन चमचे जिरे एक लिटर पाण्यात रात्री भिजत घालणे. त्यात एक खडीसाखरेचा खडा टाकणे. सकाळी गाळून दिवसभर थोडे थोडे घेतल्यास लघवीची जळजळ कमी होण्यास मदत होते.

३) दोन वेलदोडे सोलून दोन्ही जेवणानंतर खावे. पित्ताच्या जळजळसाठी उपयोग होतो.

४) एक चमचा जिरे एक भांडे पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून प्यावे. पचन व detoxification साठी मदत होते.

५. दोन्ही जेवणानंतर १०-१० मनुका खाल्ल्यास संडासला साफ होणे, मूळव्याध, फिशर, गॅसेस या सर्वांचा त्रास कमी होतो.

६) दोन्ही जेवणानंतर दोन चमचे जवस खावे. कफासाठी उपयोग होतो व पचनही सुधारते.

७) निरंजन फळ रात्री पाण्यात भिजवून सकाळी मिक्सर मधून काढून घेतल्यास मूळव्याधीसाठी उपयोग होतो.

८) ज्यांना पित्ताचा त्रास होतो तरीही जागरणे करावी लागतात त्यांनी रात्री झोपताना मनुका खाव्यात.

९) सकाळी उठल्यावर साळीच्या लाह्या किंवा खजूर खाल्ल्यानेज्यांना पित्तामुळे जळजळ किंवा मळमळ होते ती कमी होते.

१०) पंजाबी, मसालेदार अन्न खाल्ल्यावर बऱ्याच जणांना पोटाचा त्रास होतो. त्यामुळे असे जेवण झाल्यावर पाण्यात थोडे लिंबू पिळून पिऊन टाकावे. त्रास कमी व्हायला मदत होते.

११) ज्यांना वात किंवा पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी दोन्ही जेवणापूर्वी दोन चमचे तूप खावे.

१२) पोटाला तडस लागेपर्यंत कधीही जेऊ नये. १/४ जागा वाताच्या चलनवलनासाठी रिकामी ठेवावी.

१३) पाणी पिताना घटाघटा पाणी न पिता तोंडाला भांडे लाऊनच प्यावे.

१४) दुपारचे जेवण १२ ते १२.३० पर्यंत आणि रात्रीचे ८ वाजेपर्यंत करावे.

१५) पोट साफ होत नसल्यास रोज रात्री भिजवलेले २०-२५ मनुके खावे.

१६) सकाळी उठल्यावर तुळशीची ५-६ पाने खावीत. घशातील कफ कमी होण्यास मदत होते.

१७) रात्री झोप नीट लागत नसल्यास पादाभ्यंग (गुडघ्याखाली पायाला मसाज) करावे. डोळ्यांसाठी पण याचा उपयोग होतो.

१८) पित्ताचा त्रास होत असेल तर तूर ऐवजी मूग डाळ वापरावी.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

6 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

7 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

7 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

7 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

8 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

11 तास ago