1) जेवणानंतर एक चमचा भाजलेले तीळ आणि जवस खावे. पचनासाठी आणि कोलेस्टेरॉल साठी उपयुक्त असतात.
२) दोन चमचे धणे व दोन चमचे जिरे एक लिटर पाण्यात रात्री भिजत घालणे. त्यात एक खडीसाखरेचा खडा टाकणे. सकाळी गाळून दिवसभर थोडे थोडे घेतल्यास लघवीची जळजळ कमी होण्यास मदत होते.
३) दोन वेलदोडे सोलून दोन्ही जेवणानंतर खावे. पित्ताच्या जळजळसाठी उपयोग होतो.
४) एक चमचा जिरे एक भांडे पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून प्यावे. पचन व detoxification साठी मदत होते.
५. दोन्ही जेवणानंतर १०-१० मनुका खाल्ल्यास संडासला साफ होणे, मूळव्याध, फिशर, गॅसेस या सर्वांचा त्रास कमी होतो.
६) दोन्ही जेवणानंतर दोन चमचे जवस खावे. कफासाठी उपयोग होतो व पचनही सुधारते.
७) निरंजन फळ रात्री पाण्यात भिजवून सकाळी मिक्सर मधून काढून घेतल्यास मूळव्याधीसाठी उपयोग होतो.
८) ज्यांना पित्ताचा त्रास होतो तरीही जागरणे करावी लागतात त्यांनी रात्री झोपताना मनुका खाव्यात.
९) सकाळी उठल्यावर साळीच्या लाह्या किंवा खजूर खाल्ल्यानेज्यांना पित्तामुळे जळजळ किंवा मळमळ होते ती कमी होते.
१०) पंजाबी, मसालेदार अन्न खाल्ल्यावर बऱ्याच जणांना पोटाचा त्रास होतो. त्यामुळे असे जेवण झाल्यावर पाण्यात थोडे लिंबू पिळून पिऊन टाकावे. त्रास कमी व्हायला मदत होते.
११) ज्यांना वात किंवा पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी दोन्ही जेवणापूर्वी दोन चमचे तूप खावे.
१२) पोटाला तडस लागेपर्यंत कधीही जेऊ नये. १/४ जागा वाताच्या चलनवलनासाठी रिकामी ठेवावी.
१३) पाणी पिताना घटाघटा पाणी न पिता तोंडाला भांडे लाऊनच प्यावे.
१४) दुपारचे जेवण १२ ते १२.३० पर्यंत आणि रात्रीचे ८ वाजेपर्यंत करावे.
१५) पोट साफ होत नसल्यास रोज रात्री भिजवलेले २०-२५ मनुके खावे.
१६) सकाळी उठल्यावर तुळशीची ५-६ पाने खावीत. घशातील कफ कमी होण्यास मदत होते.
१७) रात्री झोप नीट लागत नसल्यास पादाभ्यंग (गुडघ्याखाली पायाला मसाज) करावे. डोळ्यांसाठी पण याचा उपयोग होतो.
१८) पित्ताचा त्रास होत असेल तर तूर ऐवजी मूग डाळ वापरावी.
(सोशल मीडियावरुन साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…