भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव यांमुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मात्र, डायबिटिजवर नियंत्रण ठेवल्यास चांगले जीवन जगता येते. मधुमेहाच्या रुग्णांना आजारात आहारावर लक्ष ठेवावे लागत असते.
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत ‘ही’ फळे
1) द्राक्षे: मधुमेहाच्या रुग्णांसाठी द्राक्षे अत्यंत हानिकारक मानली जातात. द्राक्षे खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे द्राक्षांपासून मधुमेहाच्या रुग्णांनी लांब राहिलेलेच चांगले ठरेल.
२) चेरी: चेरी हे फळ अनेकांना आवडते. पण, एक कप चेरीमध्ये साधारण २० ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे.
३) अननस: क जीवनसत्त्व असलेले अननस फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तात लवकर विरघळते आणि ग्लुकोज वाढवते. अननसामध्ये सहा ग्रॅम साखर असते. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तितक्या प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहींना अननस मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
४) आंबे: फळांचा राजा सर्वांचा आवडता आहे; पण आंब्यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर मधुमेही रुग्णांनी मोठ्या प्रमाणात आंबे खाल्ले, तर त्यांना हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना साधारणपणे आंबा न खाण्याचा किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
५) केळी: केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे; परंतु केळी खाल्ल्याने साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी केळे हे फळ मर्यादित प्रमाणातच खावे. जास्त केळी खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…