आरोग्य

तुम्ही सुध्दा जेवताना वरून मीठ घेता का

जर जेवणात मीठ कमी असेल तर जेवण फारसं चविष्ट लागत नाही. काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. पण कधी कधी नकळतपणे जेवणात मीठ कमी पडतं. आणि मग सगळ्यांना ताटात थोडं थोडं मीठ वाढायला लागतं. जेवताना पदार्थांत वरून मीठ टाकल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकतं. मीठ योग्य प्रमाणात सेवन केलं तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. अन्यथा जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागु शकतो. तर जाणून घ्या जेवणाच्या वरून जर मीठ घातलं तर कोणत्या समस्यांचा सामना करावा लागु शकतो.

अनेकदा कांदा काकडी, मुळा, खाताना आपण त्यावर मीठ घालून खातो. अश्या पध्दतीचं खाणं चवीला जरी चांगलं लागत असलं तरी वरून मीठ घेण्याची सवय महागात पडू शकते. आणि त्यांमुळे वेगवेगळे आजार होतात. मिठाच्या अतिरिक्त सेवनाने ह्दयाचे, किडनीचे किंवा नसांचे आजार होतात. उन्हाच्या दिवसात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर तहान लागते. अशा स्थितीत उन्हात फिरणाऱ्यांच्या शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते.

वृद्धांना त्यांच्या जेवणात मीठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अनेकदा जेवणात कमीच मीठ घातलं जातं. आणि त्यानंतर बाकीचे चवीनुसार मीठ जेवणात वरून वाढून घेतात. पण जेवणात असे वरून मीठ घेणे फार नुकसानकारक आहे. ही सवय मोडण्यासाठी जेवणातलं मीठाचं प्रमाण कमी करा. जेवणात वरून मीठ घेण्याची सवय सुटत नसेल. तर मीठाऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापर करु शकता. असे केल्यास तुमची मीठ घ्यायची सवय बंद होईल.

जेवणात वरून मीठ घातल्यास अनेक आजार होण्याचा धोका असतो. जेवणातील मीठात असलेलं आर्यन शरीरात सहज पचवता येतं. पण कच्च्या मीठाचं सेवन शरीरावर प्रेशर पाडतं. ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. मीठाचं अधिक सेवन केल्याने तहान कमी आणि भूक जास्त लागते. त्यामुळे जेवताना वरून खाल्ल्यास आजारांना निमंत्रण मिळते. हि वेळ टाळण्यासाठी जेवताना वरून मीठ घेणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

5 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

5 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

7 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago