आरोग्य

रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का फायदे आणि तोटे

छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिड रिफ्लक्सही एक सामान्य पचन समस्या आहे, ज्याचा त्रास जगभरातील लाखो लोकांना होत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर विविध घरगुती उपचार सांगणार्‍या कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानी यांनी सुचवलेल्या एका उपायाने लक्ष वेधले आहे.

दररोज सकाळी धण्याचे पाणी प्या

धण्याचे पाणी पचनाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. 

धण्याचे पाणी हे पाचक एन्झाइम्सना उत्तेजित करू शकते, संभाव्यता पचनास मदत करते आणि सूज आणि अपचन कमी करते. पण, छातीत होणारी तीव्र जळजळ टाळण्यासाठी त्याचा प्रभाव कमी असल्याचे स्पष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये पोटातील आम्लाचे उत्पादन वाढवून लक्षणे आणखी बिघडू शकतात. धण्याच्या पाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि ते दिवसभरात कधीही सेवन केले जाऊ शकते.

फायदे

पचनास मदत करते: काही अभ्यासात असे समोर आले आहे की, “धणे हे पाचक एन्झाइम्सचे उत्पादन उत्तेजित करून पचनास मदत करू शकतात, संभाव्यत: अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी आणि पोटातील अतिरिक्त आम्लाची गरज कमी करण्यासाठी प्रोत्साहन देते.

अस्वस्थता दूर करते: धण्याचे पाणी पोट फुगणे आणि अपचन कमी करते, हे सिद्ध करणारे काही पुरावे संशोधनातून समोर आले आहेत.

धोका 

छातीतील जळजळ वाढवते: धण्याचे पाणी प्यायल्याने काही लोकांना छातीतील जळजळ वाढल्याचे जाणवू शकते. याचे कारण असे की, ते पोटातील आम्लाचे उत्पादन उत्तेजित करू शकतात, जे अन्ननलिकेत परत येऊ शकते आणि छातीत जळजळ निर्माण होऊ शकते.

छातीत तीव्र जळजळ होत असलेल्या व्यक्तींसाठी धण्याचे पाणी घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

छातीत तीव्र जळजळ होत असलेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत धण्याचे पाणी समाविष्ट करताना काही विशिष्ट विचार किंवा विरोधाभास आहेत.

किती प्रमाणात प्यावे धण्याचे पाणी

कमी प्रमाणात सुरुवात करा 

कमी प्रमाणात धणे (साधारण अर्धा चमचे) पाण्यात रात्रभर भिजवून सुरुवात करा. हळू हळू शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेऊन प्रमाण वाढवा.

प्रतिसादाचे निरीक्षण करा

धण्याचे पाणी प्यायल्यानंतर तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते याकडे बारकाईने लक्ष द्या. त्रास होत असेल तर धण्याचे पाणी पिणे थांबवा.

भिजवलेले किंवा उकळलेले धण्याचे पाणी ठरेल उत्तम

भिजवणे विरुद्ध उकळणे

धणे रात्रभर भिजवणे ही उकळण्याच्या तुलनेत सौम्य पद्धत आहे. उकळल्याने धण्यामधून मजबूत अधिक केंद्रित रसायने बाहेर पडू शकतात

धण्याचे पाणी घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

औषधे

धण्याच्या पाण्याच्या काही औषधांशी रासायनिक प्रक्रिया होऊ शकते, म्हणून रक्त पातळ करणारी किंवा यकृताद्वारे चयापचय करणारी औषधे घेत असाल तर धण्याचे पाणी घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

5 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

5 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

8 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

9 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

9 तास ago