आरोग्य

झोप आणि ध्यान

ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती मिळते, पण मन मात्र स्वप्नावस्थेतही जागृत असते. आपण दिवसभरात जो विचार करत राहू, त्याचे गारुड स्वप्नावस्थेवर असते.

ध्यान ही मनाला विश्रांती देण्याची प्रक्रिया आहे. ध्यानावस्थेत तुम्ही मन एकाग्र करता. जेव्हा आपण एकाग्र असतो, तेव्हा मनात कोणतेही विचार येत नाहीत. विचारांची श्रृंंखला थांबवूनच आपल्याला ध्यान करायचे असते. मन हे माकडासारखे चपळ असते. त्याला अक्षरश: बांधून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ध्यान होय. ध्यानात मनाला पुर्ण विश्रांती मिळते. ह्या विश्रांतीचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. झोपेत शरीराला आराम मिळेल पण मनाला मिळतच नाही, तो आराम ध्यान केल्यावर मिळतो. शरीराचा मनाशी संबंध असतो, हे विज्ञानाने मान्य केले आहे. आयुर्वेदात तर ते आहेच. मानसिक ताणामुळे शरीराला होणारे आजार, ही एक वेगळी वैद्यकिय शाखा झाली आहे. दिवसभरात २० मिनिटे जरी ध्यान केले, तरी ७ तासांच्या झोपेने जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या कैकपटीने ध्यानाने ऊर्जा मिळवता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago