ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती मिळते, पण मन मात्र स्वप्नावस्थेतही जागृत असते. आपण दिवसभरात जो विचार करत राहू, त्याचे गारुड स्वप्नावस्थेवर असते.
ध्यान ही मनाला विश्रांती देण्याची प्रक्रिया आहे. ध्यानावस्थेत तुम्ही मन एकाग्र करता. जेव्हा आपण एकाग्र असतो, तेव्हा मनात कोणतेही विचार येत नाहीत. विचारांची श्रृंंखला थांबवूनच आपल्याला ध्यान करायचे असते. मन हे माकडासारखे चपळ असते. त्याला अक्षरश: बांधून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ध्यान होय. ध्यानात मनाला पुर्ण विश्रांती मिळते. ह्या विश्रांतीचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. झोपेत शरीराला आराम मिळेल पण मनाला मिळतच नाही, तो आराम ध्यान केल्यावर मिळतो. शरीराचा मनाशी संबंध असतो, हे विज्ञानाने मान्य केले आहे. आयुर्वेदात तर ते आहेच. मानसिक ताणामुळे शरीराला होणारे आजार, ही एक वेगळी वैद्यकिय शाखा झाली आहे. दिवसभरात २० मिनिटे जरी ध्यान केले, तरी ७ तासांच्या झोपेने जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या कैकपटीने ध्यानाने ऊर्जा मिळवता येते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…