ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती मिळते, पण मन मात्र स्वप्नावस्थेतही जागृत असते. आपण दिवसभरात जो विचार करत राहू, त्याचे गारुड स्वप्नावस्थेवर असते.
ध्यान ही मनाला विश्रांती देण्याची प्रक्रिया आहे. ध्यानावस्थेत तुम्ही मन एकाग्र करता. जेव्हा आपण एकाग्र असतो, तेव्हा मनात कोणतेही विचार येत नाहीत. विचारांची श्रृंंखला थांबवूनच आपल्याला ध्यान करायचे असते. मन हे माकडासारखे चपळ असते. त्याला अक्षरश: बांधून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ध्यान होय. ध्यानात मनाला पुर्ण विश्रांती मिळते. ह्या विश्रांतीचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. झोपेत शरीराला आराम मिळेल पण मनाला मिळतच नाही, तो आराम ध्यान केल्यावर मिळतो. शरीराचा मनाशी संबंध असतो, हे विज्ञानाने मान्य केले आहे. आयुर्वेदात तर ते आहेच. मानसिक ताणामुळे शरीराला होणारे आजार, ही एक वेगळी वैद्यकिय शाखा झाली आहे. दिवसभरात २० मिनिटे जरी ध्यान केले, तरी ७ तासांच्या झोपेने जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या कैकपटीने ध्यानाने ऊर्जा मिळवता येते.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…