ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती मिळते, पण मन मात्र स्वप्नावस्थेतही जागृत असते. आपण दिवसभरात जो विचार करत राहू, त्याचे गारुड स्वप्नावस्थेवर असते.
ध्यान ही मनाला विश्रांती देण्याची प्रक्रिया आहे. ध्यानावस्थेत तुम्ही मन एकाग्र करता. जेव्हा आपण एकाग्र असतो, तेव्हा मनात कोणतेही विचार येत नाहीत. विचारांची श्रृंंखला थांबवूनच आपल्याला ध्यान करायचे असते. मन हे माकडासारखे चपळ असते. त्याला अक्षरश: बांधून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, म्हणजे ध्यान होय. ध्यानात मनाला पुर्ण विश्रांती मिळते. ह्या विश्रांतीचा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. झोपेत शरीराला आराम मिळेल पण मनाला मिळतच नाही, तो आराम ध्यान केल्यावर मिळतो. शरीराचा मनाशी संबंध असतो, हे विज्ञानाने मान्य केले आहे. आयुर्वेदात तर ते आहेच. मानसिक ताणामुळे शरीराला होणारे आजार, ही एक वेगळी वैद्यकिय शाखा झाली आहे. दिवसभरात २० मिनिटे जरी ध्यान केले, तरी ७ तासांच्या झोपेने जेवढी ऊर्जा मिळते त्याच्या कैकपटीने ध्यानाने ऊर्जा मिळवता येते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…