आरोग्य

दह्यात ‘या’ चारपैकी कोणतीही १ गोष्ट कालवून खा, वजन होईल कमी अन् हाडंही होतील मजबूत

भरपूर लोक रोज आवडीनं दही खातात. दही खायला तर टेस्टी लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच दह्यात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन, मिनरल्स भरपूर असतात. पण अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर योग्य पद्धतीनं दही खाल तर त्याचे जास्त फायदे मिलू शकतात.

दह्याचे फायदे…

डॉक्टर रेखा यांनी सांगितलं की, जर योग्य व्यक्तीनं योग्य वेळी दही खाल्लं तर यापासून अनेक फायदे मिळू शकतात. ज्यामुळे वात संतुलित होतो, शुक्राणुंची गुणवत्ता सुधारते आणि हाडं मजबूत होतात. हे दह्याचे मुख्य फायदे आहेत.

दही लवकर कसं पचवाल…

दह्यात सैंधव मीठ, काळी मिरी, मद आणि तूप टाकून खायला हवं. या चारपैकी कोणतीही एक गोष्ट दह्यात टाकल्यानं दही लवकर पचतं. काळी मिरीनं आणि सैंधव मिटामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत मिलते.

कुणी खावं दही..

नियमितपणे एक्सरसाईज करणारे किंवा चांगली भूक असलेल्या लोकांसाठी दही फायदेशीर असतं. ज्या लोकांना गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, स्किन डिजीज आहेत आणि जे लठ्ठपणा, जास्त वजनानं हैराण आहेत ते सुद्धा दही खाऊ शकतात.

कोणत्या वेळी खावं दही..

जास्तीत जास्त लोकांना दही खाण्याची योग्य वेळच माहीत नसते. ज्यामुळे सर्दी, खोकला, गॅस, पोटदुखी अशा समस्या होतात. आयुर्वेद डॉक्टरांनुसार, दही केवळ दुपारी खावं. यावेळे शिवाय कोणत्याही वेळी दही खाऊ नये.

वजन कमी करण्यासाठी काय…

जर तुमचं वजन वाढलेलं असेल, लठ्ठपणा असेल किंवा अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर दही खाऊ नका. दह्याऐवजी तुम्ही ताक पिऊ शकता. यातही भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक असतात. सोबतच कॅल्शिअम, प्रोटीनही असतं. ज्यामुळे पचन चांगलं होत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

5 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

12 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

12 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

12 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

12 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

12 तास ago