आरोग्य

हे पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील

कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने वाढण्याचे ते संकेत आहेत. त्यामुळे सतत भूक लागण्यावर ती नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा, तुम्हाला सतत लागणारी भूक ही वजन वाढण्यासह इतर आजारणाही निमंत्रण देण्याची शक्यता आहे.

शिवाय आजकाल लठ्ठपणा ही एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे लोक आपलं वजन कसे वाढणार नाही याची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय वाढत्या वजनामुळे केवळ शरीरच खराब दिसत नाही तर अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे अनेकांना आपलं वजन कमी करण्याची इच्छा असते पण त्यांना भूक कंट्रोल करता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा ५ सुपरफूडबद्दल माहिती, जे खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही आणि लठ्ठपणाची समस्याही उद्भवत नाही…

वजन कमी करण्यासाठीचे ते ५ सुपरफूड्स

बदाम: बदाम हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट, प्रथिने आणि फायबर असतात. बदाम खाल्ल्याने भूक लागणं खूप कमी होते. तसंच त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई मुळे वजन वाढण्यास आळा बसतो.

नारळ: नारळ हे आपणाला सहज आणि कुठेही उपलब्ध होणारे फळ आहे. नारळात लॉरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड असे अनेक घटक आढळतात. ज्यामुळे आपणाला पोट भरल्यासारखे वाटते. नारळाला जलद गतीने फॅट बर्न करणारे फळ मानले जाते.

ताक: ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. शरीराची तरलता राखण्यासाठी ताकापेक्षा चांगला पर्याय नाही. ताक प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपोआप लठ्ठपणाला आळा बसतो.

मोड आलेले हरभरे: मोड आलेल्या हरभरामध्ये जास्त प्रथिने आढळतात. त्यामध्ये भूक कमी करणारे हार्मोन्स असतात. याशिवाय त्यात फॅट आणि कार्बोहायड्रेट्स खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे मोड आलेला हरभरा हा लठ्ठपणाचा शत्रू असल्याचे मानले जाते.

भाज्यांचा रस: भाज्यांच्या रस हा लठ्ठपणा मुळापासून दूर करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर जास्त वेळेपर्यंत भूक जाणवू देत नाहीत. भाजीपाल्याच्या रसात जवसाच्या बिया मिक्स केल्या तर ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 मिनिटे ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

12 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

12 तास ago

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…

12 तास ago

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…

12 तास ago

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…

12 तास ago