पुणे: जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश सातपुते असं मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाच नाव आहे. पोलिसांनी अविनाशच्या अंगावर टेम्पो घालून चिरडल्या प्रकरणी समीर मोहम्मद शेख,अनिकेत बाळू शिंदे, दिगंबर अनिल पांगारे, सुरज विलास पवार, तनवीर तानाजी पांगारे यांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि त्याचा मित्र यांचे आरोपी बरोबर जुने भांडण झाले होते. या जुन्या भांडणाच्या वादातून अंगावर टेम्पो घालून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. भांडण मिटवायची आहेत, असे सांगून रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. मयत अविनाश हा त्याच्या मित्रांसोबत पहाटे रस्त्यावर उभा होता. त्यावेळी वाद मिटवायचाय तू रस्त्यावर थांब असं म्हणत अविनाशला रस्त्यावर उभा राहण्यास सांगितलं. यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावर टेम्पो घातला त्यात अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…
मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…
शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…
शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने…
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…