आरोग्य

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भारतातील प्रत्येक घरात डाळ भात बनवले जातात. रोजच्या जेवणात हा सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने हा रुचकर असतो, तर आरोग्यासाठी याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असते. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा वजन कमी करायचे आहे, त्यांनीही डाळ-भाताचे सेवन करावे.

डाळी मध्ये आढळणारे पोषक तत्व

हे आरोग्यासाठी एक खजिना आहेत. डाळी मध्ये फायबर, ब-जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, जस्त आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी आवश्यक आहेत. डाळी मध्ये चरबीचे प्रमाण फारच कमी असते. खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध जे पचनास मदत करतात. डाळ पचायला खूप सोपे आहे. यासोबतच कडधान्ये खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्या सारखे वाटते. भूक न लागल्याने जास्त कॅलरीज घेण्याची चिंता नसते आणि वजन नियंत्रणात राहते.

भातात आढळणारे पोषक तत्व

डाळी प्रमाणेच भातातही अनेक पोषक तत्वे आढळतात. त्यात सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आढळतात. भाताच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. भातात हानिकारक चरबी किंवा कोलेस्ट्रॉल आणि सोडियम नसते. भात हा संतुलित आहार आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्राऊन राइसही खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी डाळ-भात खाणे

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक आहाराकडे विशेष लक्ष देतात. भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. पण डाळ-भात योग्य पद्धतीने आणि वेळेवर सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. रात्रीच्या जेवणात एक महिना डाळ-भात सामान्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा परिणाम दिसू लागेल. डाळ-भात खाताना लक्षात ठेवा की, डाळ जास्त प्रमाणात आणि भात कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे. डाळ-भातावर साजूक तूप घातल्याने तो संतुलित आहार बनतो. तुपात A, D, E, K ही जीवनसत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

21 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

21 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

21 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

21 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

21 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

21 तास ago