आरोग्य

टाचदुखी कारणे व घरगुती उपाय

कारणे

नियमित पोट साफ न होणे.

जड अन्नपदार्थ जास्तच खाणे.

घाईघाईने जेवणे.

उपाय

एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या.

लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा.

हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळ संध्याकाळ करा.

कोमटच पाणी प्या.

पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. किंवा एरंडेल तेल रात्री कोमट पाण्यातून घेणे.

हलका आहार घ्या.

टाचेला श्वास रोखून तेल लावून माँलिश करा. श्वास सोडल्यावर माँलिश थांबवा. नंतर पुन्हा श्वास रोखून माँलिश करा. असे ५/१० वेळा करा. रिकाम्या पोटीच करा.

रिकाम्या पोटी काहीवेळ श्वास रोखून टाचेवर चाला.

नियमित प्राणायाम करा.

आवळा पदार्थ खा.

टाचदुखी कशामुळे होते?

बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला ‘प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते.

प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचा देखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे.

सोपे उपचार

खडे मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकवाव्यात.

टाचदुखी हा वाताचा प्रकार आहे. होमिओपथिच्या गोळ्या घ्याव्यात.

मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.

फिजिओ थेरेपीचे काही सोपे एकसरसाइज, जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायचं.

जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेवून पायाच्या बोटा नी टॉवेल जवळ आणायचा.

टाचेवर बिब्बा घालून पहा.

रूईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकणे.

गोडे तेलात मीठ घालून फेटावे व रात्री टाचेला लावून प्लास्टिकचा कागद बांधून झोपावे.

पाण्याची pet वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे. सुरवातीला खुपच गार वाटते पण मग बरे वाटु लागते. असे साधारण ५-१०मिनिटे करावे. असे दिवसातुन २-३ वेळा करावे. दुसर्‍या दिवशी बराच फरक वाटेल. असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल.

बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.

योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.

शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करून ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

1 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

1 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

1 तास ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

3 तास ago

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

20 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

22 तास ago