गुळाला साखरेसारखं रिफाइन केलं जात नाही. ज्यामुळे त्यात अनेक पोषक तत्व कायम राहतात. गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्याने थंडीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते.
हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे
गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं. हिवाळ्यात गुळाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत आणि याचं सेवन कसं कराव.
१) मसल्स मजबूत होतात
हिवाळ्यात गुळाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. गुळामध्ये आयर्न असतं. आयर्न हेल्दी ब्लड सेल्सला सपोर्ट करण्यात मदत करतं. याने तुमचा थकवा दूर होईल आणि मांसपेशी मजबूत होतील.
२) एनीमियापासून बचाव
शरीरात आयर्नची कमतरता झाली की, एमीनियाचा धोका वाढतो. ज्यामुळे मसल्स कमजोर होतात आणि थकवा जाणवतो. त्यामुळे गूळ आयर्नचा महत्वाचा स्त्रोत ठरतो. याचा नियमित आहारात समावेश केल्याने एनीमियाचा धोका कमी होतो.
३) आजारांचा धोका कमी होतो
हिवाळ्यातील तुमच्या रोजच्या आहारात गुळाचा समावेश करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. यात ॲट ऑक्सिडेंट आणि फेनोलिक ॲसिड असतं, ज्यामुळे शरीरावर ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी पडतो.
४) पचन तंत्र चांगलं राहत
पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी गुळाचा खूप फायदा होतो. बरेच बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे गुळाचं सेवन करतात.
५) इम्यूनिटी वाढते
गुळाचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. गुळात असलेल्या पोषक तत्व आणि ॲटी ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. अशात अनेक जुन्या आजारांना रोखलं जाऊ शकतं.
कसं कराल गुळाचं सेवन
गूळ तुम्ही थेटही खाऊ शकता. जर तुम्हाला थेट गूळ खाणं आवडत नसेल तर याचे गूळ आणि तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडूही बनवू शकता. तुम्ही रोज २५ ग्रॅम गुळाचं सेवन करू शकता. जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात गुळाच्या चहाचं सेवन करतात. महत्वाची बाब म्हणजे खूप जास्त गूळ खाल्ल्याने तुम्हाला जुलाब लागू शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…