आरोग्य

रोज करता ते जेवण आयुर्वेदिक कसं बनवाल, बघा सोपी पद्धत

उठण्या-बसण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंतचे झोपण्याचे सगळे नियम सांगितले आहेत. जे फॉलो करून तुम्ही एक नॅचरल आणि हेल्दी जीवन जगू शकता. हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच तुमचं आयुष्यही वाढवतात. आयुर्वेदात आयुर्वेदिक जेवण कसं असतं, याबाबतही सांगण्यात आलं आहे. हे आयुर्वेदिक जेवण तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतं.

तुम्ही आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदिक उपचार किंवा चिकित्सेबाबत, आयुर्वेदिक औषधांबाबतही ऐकलं असेल. पण आपण जे जेवतो किंवा खातो त्याला आयुर्वेदिक कसं करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर प्रसिद्ध आयुर्वेडिक डॉक्टर निधी पांड्या यांनी याबाबत माहिती दिली आहे

आयुर्वेदिक जेवण बनवण्याची पद्धत…

गरम आणि मऊ जेवण

डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण नेहमीच गरम आणि मऊ केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी अन्न पचनास मदत करणाऱ्या अग्निसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे अन्न चांगलं शिजवा, गरम ठेवा आणि मसाल्यांचा योग्य वापर करा. अन्न मुलायम किंवा नरम ठेवण्यासाठी गुड फॅटचा वापर करा.

जेवणात ६ रस…

आयुर्वेदानुसार संपूर्ण जेवण तेच असतं, ज्यात ६ रसांचा समावेश असतो. गोड, आंबट, खारट, तिखट, कडवट आणि अस्ट्रिंजेंट हे रस जेवणात महत्वाचे असतात.

कशातून मिळतील हे रस…

गोड: गोडवा तुम्हाला पोषण देणाऱ्या जेवणातून म्हणजे धान्य, कंदमूळं, कुकिंग फॅट यातून मिळेल.

आंबट: पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि पचनासाठी रस बनवण्यासाठी तुम्हाला आंबट रस लिंबू आणि लोचण्यातून मिळेल.

खारट: जेवण पचवण्यासाठी हिमालयन रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ वापरू शकता.

तिखट: शरीरात जमा झालेला प्लाक तोडण्यासाठी जिरे, धणे, हळद, लवंग, तेजपत्ता यातून तिखट मिळेल.

कडू: पोट थंड ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि हळदीतून कडवटपणा मिळेल.

अस्ट्रिंजेंट: जास्त झालेलं पाणी कमी करण्यासाठी आणि पचन रोखण्यासाठी हर्ब्स, डाळी आणि हळदीतून हे मिळेल.

आयुर्वेदिक जेवण: आयुर्वेदिक जेवण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डॉक्टरांनी आयुर्वेदिक जेवणाचं एक उदाहरण दिलं. यासाठी एक धान्य, एक डाळ, काही मसाले, गुड फॅट, मीठ, लिंबू, काही हर्ब्सपासून तयार जेवण जेवू शकता.

काही रहस्य: हळदीमध्ये वर दिलेल्या लिस्टमधील शेवटचे तीन रस असतात. जे कशा एकातून मिळणं अवघड आहे.

आवळ्यामध्ये ६ पैकी ५ रस असतात, पण याचा वापर थोडा अवघड आहे.

अस्ट्रिंजेंट रसासाठी जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण तो आयुर्वेदिक ताकातून मिळवता येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

11 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

11 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

11 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago