आरोग्य

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

पावसाळा सुरु होताच, सोबत येते विविध आजाराची साथ. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसते. कोरोनातून काहीसा दिलासा मिळत असतानाच, आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हा डेंग्यू कसा होतो. त्यापासून कसा बचाव करावा, याबाबत जाणून घेऊ या..

डेंग्यू म्हणजे नेमक काय?
रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यान डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत असते. प्रामुख्यानं NS-1, Igm आणि IGG या तीन चाचण्यांतून डेंग्यूच निदान होते.

डेंग्यूची प्रमुख लक्षणे
▪️ अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, हाड आणि प्रामुख्यान सांध्यांमध्ये वेदना होण.
▪️ शरीरावर पुरळ येणं, नाकातून किंवा दातातून, लघवीद्वारे लक्षणं दिसल्यास हा प्रकार गंभीर आहे, अस समजाव.

उपचार आणि काळजी
▪️ डेंग्यूवर ठराविक उपचार वा औषध उपलब्ध नाही पण वेळीच उपचार झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविता येते.
▪️ रुग्णाला लक्षणांनुसार औषध दिली जातात. ताप किंवा अंगदुखीवर औषध दिली जातात.
▪️ रुग्णाने विश्रांती घेणे ही सर्वांत गरजेचे, तसेच भरपूर पाणी प्यावे, साधा आहार घ्यावा.
▪️ शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.

डेंग्यूच्या अळींचा अटकाव
▪️ परिसर स्वच्छ असणे, सर्वात महत्त्वाचं आहे.
▪️ घरात एसी, फ्रीजखाली पाणी साचू देऊ नका
▪️ परिसरात, घरावर पावसाचे पाणी साचू देऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

5 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

5 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

5 तास ago