आरोग्य

राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

पावसाळा सुरु होताच, सोबत येते विविध आजाराची साथ. पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूची रुग्ण संख्याही वाढल्याचे दिसते. कोरोनातून काहीसा दिलासा मिळत असतानाच, आरोग्य यंत्रणेसमोर डेंग्यूच्या रुपाने नवे आव्हान उभे राहिले आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. हा डेंग्यू कसा होतो. त्यापासून कसा बचाव करावा, याबाबत जाणून घेऊ या..

डेंग्यू म्हणजे नेमक काय?
रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यान डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत असते. प्रामुख्यानं NS-1, Igm आणि IGG या तीन चाचण्यांतून डेंग्यूच निदान होते.

डेंग्यूची प्रमुख लक्षणे
▪️ अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, हाड आणि प्रामुख्यान सांध्यांमध्ये वेदना होण.
▪️ शरीरावर पुरळ येणं, नाकातून किंवा दातातून, लघवीद्वारे लक्षणं दिसल्यास हा प्रकार गंभीर आहे, अस समजाव.

उपचार आणि काळजी
▪️ डेंग्यूवर ठराविक उपचार वा औषध उपलब्ध नाही पण वेळीच उपचार झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविता येते.
▪️ रुग्णाला लक्षणांनुसार औषध दिली जातात. ताप किंवा अंगदुखीवर औषध दिली जातात.
▪️ रुग्णाने विश्रांती घेणे ही सर्वांत गरजेचे, तसेच भरपूर पाणी प्यावे, साधा आहार घ्यावा.
▪️ शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.

डेंग्यूच्या अळींचा अटकाव
▪️ परिसर स्वच्छ असणे, सर्वात महत्त्वाचं आहे.
▪️ घरात एसी, फ्रीजखाली पाणी साचू देऊ नका
▪️ परिसरात, घरावर पावसाचे पाणी साचू देऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

8 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

20 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

21 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago