आरोग्य

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात.

कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी आवश्यक आहेत. त्यात प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते. तसेच त्यात वजीवनसत्त्व B-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3, B6) यांचा समावेश असतो. या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि त्वचा-केस निरोगी राहतात. कलोंजीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात आणि त्वचा सुंदर ठेवण्याची प्रक्रिया सुरु करतात.

कलोंजीचे आरोग्यदायी फायदे

कलोंजीचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था बळकट होते. अ‍ॅसिडिटी, गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांवर ती परिणामकारक ठरते. तिच्या उष्ण गुणधर्मांमुळे थंडी, खोकला, घसा बसणे किंवा सर्दी झाल्यास ती औषधाप्रमाणे काम करते. कलोंजीतील सक्रिय घटक रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात, त्यामुळे मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्यांसाठीही ती उपयुक्त आहे. हृदयासाठी या बिया फारच फायद्याच्या असतात. आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात.

कलोंजी रोगप्रतिकारशक्ती वाढवते. नियमितपणे घेतल्यास ती संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते. त्वचेसाठी ती नैसर्गिक टॉनिकप्रमाणे कार्य करते. कलोंजी तेल लावल्यास मुरुम, डाग, डार्क सर्कल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला येतो. केसांसाठीही कलोंजी औषधासारखी आहे. तिचं तेल डोक्याला लावल्यास केस गळणे थांबते, केस दाट आणि काळे होतात.

कलोंजीचा आहारात समावेश विविध प्रकारे करता येईल. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा कलोंजी गिळल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचन सुधारते. कलोंजी मधात मिसळून घेतल्यास सर्दी, खोकला, थकवा यावर आराम मिळतो आणि प्रतिकारशक्ती वाढते. भाजून घेतलेली कलोंजी भाजी, दही, पराठे किंवा सलाडवर घालायची. ती चव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगली असते.

थोडक्यात, कलोंजी हा छोटासा पण अत्यंत गुणकारी आहार घटक आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात खाल्याने शरीर निरोगी, ताजेतवाने आणि ऊर्जादायी राहते. ती केवळ मसाला नसून एक नैसर्गिक औषध आहे, जे आधुनिक काळातही आपल्या दैनंदिन आहारात असायलाच हवे.

(सोशल मिडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

17 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago