लसूण जवळपास रोज जास्तीत जास्त भारतीय भाज्या किंवा पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी दिल्याशिवाय पदार्थांना टेस्टच येत नाही. लसणानं जेवणाला टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्याला सुद्धा एकापेक्षा एक जबरदस्त फायदे मिळतात. त्यामुळे आयुर्वेदात सुद्धा लसणाला एक महत्वाची औषधी मानलं जातं. लसणामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. म्हणून लसूण हृदयरोग दूर ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.
रोज सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देत असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ लसूण खाऊनच याचे फायदे मिळतात असं नाही. लसूण न खाताही तुम्हाला याचे फायदे मिळू शकतात. पूर्वी लोक झोपताना उशीखाली लसणाची एक कळी ठेवायचे. आता यानं काय होतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.
लसणातील पोषक तत्वं
लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. लसणात अॅलिसिन नावाचं औषधी तत्त्व असतं. त्यामुळ फंगस, बॅक्टेरिया दूर होण्यास मदत मिळते.
घरातील हवा शुद्धा करतो लसूण
तुम्ही ऐकलं असेल की, पूर्वी घराच्या एखाद्या कोपऱ्यात लसूण बांधून ठेवत होते. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची कळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.
झोप चांगली लागते
असं मानलं जातं की, उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपल्यानं झोपेची क्वालिटी सुधारते आणि झोपेसंबंधी इतरही समस्या दूर होतात. याचं कारण लसणामध्ये सल्फर असतं. ज्याच्या गंधामुळे तुम्हाला शांत वाटतं आणि झोप चांगली येते.
नकारात्मक ऊर्जा दूर होते
लसूण नकारात्मक उर्जा खेचून घेतो आणि सकारात्मक उर्जा देतो. त्यामुळे आजही अनेक लोक लसणाची एक कळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.
कफ दूर होतो
लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. तसेच पोटाच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात. शरीरातील अनेक विषारी पदार्थ यामुळे बाहेर पडतात.
गॅस होत नाही
पोटात गॅस तयार होण्याची समस्या लसूण दूर करतो. लसूण हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो. लसणाचा गंध या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…