आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, बैठेपणा आणि तणावामुळे मूळव्याध, अपचन, बद्धकोष्ठता तसेच शौचासोबत रक्त पडण्यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशा वेळी आयुर्वेदात सांगितलेले घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये सुरण कंद (Elephant Foot Yam) हा एक प्रभावी आणि औषधी गुणधर्मांनी युक्त पर्याय मानला जातो.
आयुर्वेदिक परंपरेत सुरण कंदाला विशेष महत्त्व आहे. पचनसंस्था सुधारण्यासोबतच मूळव्याधीवरील त्रास कमी करण्यासाठी सुरणाचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. सुरणामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयर्न मुबलक प्रमाणात आढळते. हे घटक पचनक्रिया सुधारतात, आतड्यांची हालचाल सुरळीत करतात आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
मूळव्याध आणि रक्तस्रावावर परिणामकारक
मूळव्याधीमध्ये गुदद्वाराजवळील शिरा सुजून वेदनादायी गाठी निर्माण होतात. या त्रासावर सुरण कंद उपयुक्त ठरतो. तज्ज्ञांच्या मते, सुरण कंद तुपात किंवा तेलात भाजून सेवन केल्यास आतड्यांची कार्यक्षमता वाढते, सूज कमी होते आणि रक्तस्रावावर नियंत्रण मिळण्यास मदत होते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो.
अपचन व बद्धकोष्ठतेवर गुणकारी
अपचन, गॅस आणि पोट फुगणे या समस्या अनेकांना भेडसावतात. सुरणातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे मल सैल होतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सुरण सहाय्यक ठरतो.
सेवन करताना घ्यावयाची काळजी
सुरण कंद कच्चा खाल्ल्यास घशात खवखव किंवा चुरचुरी जाणवू शकते. त्यामुळे तो नेहमी शिजवून किंवा तुपात/तेलात भाजूनच खावा. शिजवताना लिंबू रस किंवा चिंच घातल्यास त्याची उष्णता कमी होते. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी आठवड्यातून २ ते ३ वेळाच सुरणाचे सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
आयुर्वेदिक दृष्टिकोन
आयुर्वेदानुसार सुरण वात, पित्त आणि कफ दोष संतुलित ठेवण्यास मदत करतो. रक्तशुद्धीकरण, पचन सुधारणा आणि मूळव्याधीवरील नियंत्रणासाठी सुरण उपयुक्त मानला जातो. त्यामुळे सुरण कंद हा केवळ भाजी नसून एक नैसर्गिक औषध असल्याचे आयुर्वेदात नमूद केले आहे.
नैसर्गिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करून आरोग्य सुधारता येऊ शकते. सुरणासारख्या पारंपरिक कंदभाज्यांचा योग्य वापर केल्यास दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…